मुंबई । 2007 मध्ये बांगलादेश दौर्यावर मनोज तिवारी त्याची पहिली कसोटी खेळणार होता, परंतु क्षेत्ररक्षण सरावाच्या वेळी खांद्यावर घसरल्यामुळे त्याला बाहेर बसावे लागले. यानंतर, त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही.
बंगालचा फलंदाज मनोज तिवारीने खुलासा केला आहे की 2007 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात न खेळण्याचे दुःख आजही आहे. तो म्हणाला की, “मी इतका निराश होतो की हॉटेलच्या खोलीत मी खूप रडलो.” एका स्पोर्ट्स वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मनोजने याचा खुलासा केला.
2006-07 च्या हंगामात मनोजने बंगालकडून चांगली कामगिरी केली. त्यानंतर 7 सामन्यात 99.5 च्या सरासरीने त्याने 796 धावा केल्या. त्या मोसमात रॉबिन उथप्पा (4 शतके, 3 अर्धशतकांसह 854 धावा) नंतर तो दुसऱ्या क्रमांकाचा धावा करणारा खेळाडू होता.
तिवारीने ऑस्ट्रेलियामध्ये सीबी मालिकेदरम्यान एक वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्या सामन्यात तिवारी 2 धावांवर बाद झाला. पुढचा सामना खेळण्यासाठी त्याला तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली.
तो म्हणाला की, “जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तेव्हा मधल्या फळीतील बहुतेक फलंदाज धावा करत नव्हते. मधल्या फळीत एक जागा होती जिथे मी फिट होऊ शकत होतो. पण मला संधी मिळाली नाही.”
मनोज हा भारताच्या त्या दुर्दैवी फलंदाजांपैकी एक आहे, ज्याला शतक झळकावल्यानंतर पुढच्या सामन्यातून वगळण्यात आले. भारताकडून पदार्पणानंतर तिवारीने डिसेंबर 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 104 धावांची नाबाद मॅच विनिंग खेळी केली होती. पण नंतर त्याला संघातून वगळण्यात आले.
मनोजने भारताकडून 12 वनडे सामने खेळले आहेत
2012 च्या श्रीलंका दौर्यावर त्याला भारताकडून खेळण्याची पुढील संधी मिळाली. त्यानंतर त्याने एका वनडे सामन्यात 21 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 65 धावा केल्या. पण त्यानंतर त्याला 2 वर्ष संघातून वगळण्यात आले. 2015 मध्ये झिम्बाब्वेच्या दौर्यावर 3 वन डे मालिका ही त्याची भारतासाठी शेवटची मालिका होती. त्याने 12 वनडे सामन्यात 287, तर 3 टी -20 सामन्यात 15 धावा केल्या आहेत. वनडे सामन्यात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. परंतू तेव्हा कसोटी सामना खेळण्याची हुकलेली संधी त्याला परत कधीही मिळाली नाही.