आजपासून बरोबर ३० वर्षांपूर्वी ३० जुलै १९९० रोजी भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देवने इंग्लड विरुद्ध इंग्लंडमध्ये ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोव-ऑन पासून वाचवले होते.
इंग्लंडमध्ये झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लॉर्ड मैदानावर झाला. पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाने १६२ षटकांत ६५३ धावांचा डोंगर उभा केला.
पहिल्या डावात भारताने ९ विकेट्सवर ४३० अशी मजल मारली होती आणि भारताला फॉलो-ऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.
त्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले परंतु भारताने १ धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलो ऑन टाळला.
???????? Happy birthday to India's greatest all-rounder, @therealkapildev…
When India needed 24 runs to save follow on with just one wicket left against England at Lord's in 1990, he stepped up to smash 4 sixes in a row! pic.twitter.com/5V8cd8UjLC
— The Sportsman (@TheSportsman) January 6, 2018
भारत या सामन्यात पुढे २४७ धावांनी पराभूत झाला. परंतु कपिल देव यांची ही खेळी आजही चाहते विसरले नाहीत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा सचिनचा केवळ ८वा सामना होता तर भारतीय संघाचा कर्णधार होता मोहम्मद अझरुद्दीन.
त्या सामन्यातील धावफलक:
इंग्लंड:
पहिला डाव: ६५३/४ घोषित
दुसरा डाव: २७२/४ घोषित
भारत:
पहिला डाव: ४५४ सर्वबाद
दुसरा डाव: २२४ सर्वबाद
इंग्लंडने हा सामना २४७ धावांनी जिंकला.
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अँडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’
एमएस धोनीच्या सीएसके संघातील ३ फ्लॉप खेळाडू, ज्यांच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होतं मोठ नाव
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने कसली कंबर, आयपीएल २०२० बाबत घेतले ‘हे’ मोठे ५ निर्णय
आयपीएलच्या सर्व संघातील डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, जे १३व्या हंगामात करु शकतात कमाल
…आणि इथेच वेस्ट इंडिजची टीम चूकली, या दिग्गजाने सांगितले वेस्ट इंडिजच्या पराभवाचे कारण