नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची खेळामधील सर्वात मोठा मानला जाणारा पुरस्कार म्हणजेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे. रोहितसोबतच महिला पहेलवान विनेश फोगाट, टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आणि २०१६ मध्ये पॅरालिम्पिक सुवर्णपदक मिळविणारा मरियाप्पन थांगावेलु या खेळाडूंनाही या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.
या शिफारसीनंतर केंद्रीय क्रीडा मंत्रायलाची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद निवडण्यात आलेल्या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. रोहित शर्मापूर्वी भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहलीला त्यांच्या कामगिरीमुळे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
रोहितने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने २०१९ हे वर्ष गाजवले होते. त्याचे २०१९ हे वर्ष वनडे क्रिकेटमधील आकडेवारीच्या दृष्टीने सर्वोत्कृष गेले होते. त्याने मागील वर्षी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यात त्याने २८ सामने खेळताना ५७.३० च्या सरासरीने १४९० धावा केल्या आहेत. त्यात ६ अर्धशतके आणि ७ शतकांचा समावेश आहे. ही कामगिरी एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपेक्षा सर्वोच्च आहे.
त्याने मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या वनडे विश्वचषकात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यादरम्यान त्याने ९ सामने खेळताना ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या होत्या. त्यात त्याने सर्वाधिक ५ शतके ठोकली होती. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला आयसीसीचा ‘वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्यामुळे त्याला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
२९ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त राष्ट्रपती त्या खेळाडूंना सन्मानित करतील, ज्यांनी मागील वर्षी क्रीडाक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या दिवशी खेळाडूंना अर्जुन पुरस्कार आणि सर्वात्तम खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. याव्यतिरिक्त उत्कृष्ट प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले जाते.
महत्त्वाच्या बातम्या-
-चहलच्या होणाऱ्या पत्नीने केला ‘दारू बदनाम’ गाण्यावर धमाकेदार डान्स; व्हिडिओ झाला व्हायरल
-सचिन-रोहितच्या शतकांचे विक्रम मोडतील, पण धोनीचे हे विक्रम कोणीही मोडू शकणार नाही,’ पाहा कोण म्हणतंय
-धोनीच्या निवृत्तीनंतर या दोन भारतीय खेळाडूंना आता येणार सुखाची झोप
ट्रेंडिंग लेख-
-वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला
-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणारे ३ भारतीय क्रिकेटपटू
-आयपीएल २०२०: आरसीबीसाठी असे असू शकतात सलामी जोडीचे ३ पर्याय