राजस्थान रॉयल्स म्हणजे आयपीएलचा पहिला हंगाम जिंकणारा संघ. २००८ मध्ये जेतेपद जिंकल्यानंतर या संघाला पुन्हा या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. राजस्थान रॉयल्स संघाने बर्याच हंगामात शानदार प्रदर्शन केले असले तरी, त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. राजस्थानने, पुन्हा विजेतेपद न मिळवण्याचे प्रमुख कारण म्हणजे आधीच्या संघातील बरेचशे खेळाडू इतर संघांना सामील झाले. त्यामुळे राजस्थान संघ काहीसा कमकुवत झाला.
सुरुवातीच्या हंगामात, राजस्थान रॉयल्स संघात शेन वॉर्न, ग्रॅमी स्मिथ, युसूफ पठाण, रवींद्र जडेजा, शेन वॉटसन यांच्यासारखे एकाहून एक सरस खेळाडू होते. या अनुभवी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्थानिक खेळाडू खेळत. काही खेळाडूंनी राजस्थानसाठी दिमाखदार कामगिरी करून खूप प्रसिद्धी मिळवली होती. पण, एक वेळ अशी आली की हे दर्जेदार स्थानिक खेळाडू आयपीएलमधून पूर्णपणे गायब झाले. अशाच आयपीएल मधून अचानक गायब झालेल्या,तीन खेळाडूंविषयी आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
१) कामरान खान
शेन वॉर्नने स्वतः शोधलेल्या उत्तर प्रदेशच्या कामरान खान या वेगवान गोलंदाजाला राजस्थान रॉयल्सने संधी दिली. २००९ आयपीएल आधीच शेन वॉर्नने ‘ ट्रम्पकार्ड ‘ म्हणून कामरानची चांगलीच प्रसिद्धी केली होती. कामरानकडे वेग होता मात्र तो अनेकदा दिशा भटकत.
२००९ व २०१० या दोन सत्रात तो राजस्थानसाठी ८ सामने खेळला. यात त्याला ९ बळी मिळविण्यात यश आले. २०११ आयपीएल लिलावात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाने त्याला खरेदी केले. तेथे त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी लाभली. २०११ नंतर तो आयपीएलमध्ये परत दिसलाच नाही. २ वर्ष उत्तर प्रदेशसाठी रणजी खेळून तो, क्रिकेट पासून कायमचा दूर झाला.
२) स्वप्निल असनोडकर
‘छोटा पॅकेट बडा धमाका ‘ असे विशेषण लावला गेलेला स्वप्नील असनोडकर हा देखील अचानक गायब झालेला राजस्थान रॉयल्सचा प्रसिद्ध खेळाडू. पहिल्या आयपीएल हंगामात दिग्गज ग्रॅमी स्मिथसोबत सलामीला येऊन विरुद्ध गोलंदाजांची भरपूर धुलाई स्वप्निलने केली होती. त्याची फलंदाजी पाहून मोठे मोठे क्रिकेटतज्ञ आवाक झाले होते.
२००८-२०११ या काळात तो राजस्थानसाठी २० सामने खेळला. त्यात २१.३० च्या सरासरीने तो ४२३ धावा काढू शकला. २००८ सारखी कामगिरी त्याला पुन्हा करता आली नाही. सध्या तो गृहराज्य गोवा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.
३) अशोक मेनारिया
राजस्थान रणजी संघाचा प्रमुख खेळाडू असलेला अशोक मेनारिया हा देखील थोड्या कालावधीसाठी प्रसिद्ध होऊन आयपीएलमधून बाजूला झाला. २०१० च्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारताचे नेतृत्व केलेल्या या राजस्थानी खेळाडूची आयपीएल कारकीर्द जास्त दूर जाऊ शकली नाही.
२०११-२०१३ अशी तीन वर्ष अशोकने राजस्थानसाठी खेळली. काही सामने त्याने रोमहर्षकरीत्या राजस्थान रॉयल्सला जिंकवून दिले. राजस्थान रॉयल्ससाठी २९ सामने खेळताना ४०१ धावा काढल्या. सध्या तो राजस्थान रणजी संघाचे कर्णधारपद भूषवतो.
ट्रेंडिंग लेख-
-वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे २ संघ
-कोण होणार कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० चा किंग?
-भारताच्या स्वातंत्र्यदिनी जन्मलेले ३ भारतीय क्रिकेटपटू
महत्त्वाच्या बातम्या-
-पाकिस्तानी कर्णधाराला बॉल आउटचा नियमच माहित नव्हता; भारतीय अष्टपैलू खेळाडूचा खुलासा
-इम्रान खान स्वत:ला देव समजतोय; त्याला मी पंतप्रधान केलंय, माजी क्रिकेटर कडाडला