रविवारी(३१ जानेवारी) रात्री पुणे-बंगळुरु महामार्गावर दोन कार एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला असून, यात जीवित हानीही झाली आहे, असे समोर येत आहे. कराडजवळ झालेल्या या भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की मृत्यू झालेल्यांमध्ये ३ पैलवानांचा समावेश असल्याचेही वृत्त आहे. हे तिघेही पुण्यातील कात्रज येथील रहिवासी असल्याचे समजते.
रात्री कराडजवळ आटके टप्पा येथे हा कार अपघात झाला. अपघात झालेल्या दोन्ही कार कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने येत होत्या. दरम्यान, एक कार मागून वेगात येऊन पुढील कारला जोरात धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की पुढची कार उलटी झाली. त्यामुळे या धडकीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच ५ जणं जखमी झाले.
जखमींना कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळी कराड पोलिसांनी जाऊन दखल घेतली असून ते पुढील कारवाई करतील. तरी हा अपघात नेमका कितीवाजताच्या सुमारास झाला याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध झाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
हा कसला प्रकार! क्रिकेटपटूंनी चालू सामन्यात मैदानावरच काढले कपडे, पाहा मजेशीर व्हिडिओ
…अन् ‘या’ पठ्ठ्याने अवघ्या २५व्या वर्षी झळकाविले त्रिशतक!
पंतप्रधानांचे ट्विट रिट्विट करून फसला विराट, चाहत्यांनी धरले धारेवर