क्रिकेटमधील सर्वात छोटा प्रकार म्हणजेच टी-20 मध्ये फलंदाजांच्या स्ट्राईक रेटला सर्वात जास्त महत्त्व असते. यामध्ये नेहमी या गोष्टीवर लक्ष दिले जाते की, फलंदाजांची सरासरी जरी कमी असली, तरीही त्यांचा स्ट्राईक रेट जास्त असला पाहिजे. अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये बर्याचदा चांगल्या स्ट्राईक रेटने खेळलेली खेळी सामन्याच्या निकालावर परिणाम करते. या प्रकारात फलंदाज वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांच्या संघाला फायदा मिळावा. फलंदाजांने चांगल्या स्ट्राईक रेटने केलेली खेळी दुसर्या फलंदाजांना वेगाने धावा करण्यासाठी प्रोत्साहित करते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अनेक टी-20 मालिका खेळल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना या प्रकाराबद्द्ल अनुभव आहे. भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध या टी-20 प्रकारात फलंदाजांनी बर्याच वेगवान खेळी खेळल्या आहेत. यामध्ये भारताचे फलंदाज माहीर आहेत आणि आगामी मालिकेत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
त्यामुळे आजच्या या लेखामधून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक स्ट्राईक रेटने खेळल्या गेलेल्या 3 खेळींबद्दल जाणून घेणार आहोत
3. दिनेश कार्तिक, 230.76 स्ट्राईक रेट, (ब्रिस्बेन 2018)
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारतासाठी टी-20 मध्ये बर्याचदा दमदार छोट्या मात्र महत्वपूर्ण खेळी केल्या आहेत. कार्तिकने दोनदा भारतीय संघात पुनरागमन करताना टी-20 मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दिनेश कार्तिकने 2018 साली ब्रिसबेनमध्ये एक आक्रमक खेळी केली होती. कार्तिकने फक्त 13 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 30 धावांची खेळी केली. कार्तिकने या डावात 230.76 च्या स्ट्राईक रेटने धावा करताना भारताला एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली.
2. युवराज सिंग, 233.33 स्ट्राईक रेट, (डर्बन, 2007)
सन 2007 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने केलेली खेळी कोण विसरू शकत. युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यफेरीत आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय खेळी केली होती. युवराजने या सामन्यात फक्त 30 चेंडूत 233.33 च्या स्ट्राईक रेटने 70 धावांची दमदार खेळी केली होती. आपल्या या खेळीत युवराजने 5 षटकार आणि 5 चौकार लावले होते. युवराजने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. युवराजच्या या खेळीमुळे भारताने 15 धावांनी विजय मिळवला होता.
1. शिखर धवन, 288.88 स्ट्राईक रेट, (सिडनी, 2016)
भारताचा सलामी डावखुरा फलंदाज शिखर धवन हा त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो आणि त्याने आपल्या या फलंदाजीचा नजारा ही सादर केला आहे. सन 2016 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला शिखर धवनने जोरदार सुरुवात करून दिली. शिखरने फक्त 9 चेंडूत 288.88 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत 26 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता.
ट्रेंडिंग लेख-
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश
भारतीय गोलंदाजांना रडकुंडीला आणत सर्वाधिक शतके ठोकणारे ३ धडाकेबाज फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशातील सलग दुसरा ‘क्लीन स्वीप’ वाचवण्यासाठी टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला टक्कर
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव