भारत आणि श्रीलंका संघांदरम्यान जुलैमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 3 सामन्यांची टी -20 मालिका खेळायची आहे. भारतीय संघ 3 वर्षानंतर श्रीलंका दौरा करणार असून, या दौर्याचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे.
या मालिकेसाठी भारताचे बहुतेक दिग्गज खेळाडू उपलब्ध होणार नाहीत. कारण यादरम्यानच भारतीय संघातील दिग्गज खेळाडू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असतील. त्यामुळेच एक प्रकारे भारताच्या दुय्यस संघाची निवड श्रीलंका मालिकेसाठी केली जाणार आहे. शिखर धवन, संजू सॅमसन, ईशान किशन, राहुल तेवतिया, पृथ्वी शॉ, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा या संघात समावेश होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कर्णधार म्हणून कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न आहे. तरी सध्या शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांची नावं सर्वाधिक चर्चेत आहेत.
मात्र, आपण या लेखात बघणार आहोत, अशी 3 प्रमुख कारणे ज्यामुळे भुनेश्वर कुमारला देखील भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते.
1) अनुभवी खेळाडू –
भुवनेश्वर कुमार एक अनुभवी खेळाडू आहे. त्याला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा खूप अनुभव आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 21 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 48 टी20 सामने खेळले आहेत. त्यामुळेच त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. जर त्याला कर्णधार बनविण्यात आले तर तो भारतीय संघाचे सर्वोत्तम मार्गाने नेतृत्व करू शकेल आणि मालिका जिंकू शकेल.
2) नेतृत्व कौशल्य –
भुवनेश्वर हा एक असा खेळाडू आहे ज्याकडे नेतृत्व कौशल्य आहे. तो स्वभावाने खूप नम्र आहे आणि सर्व खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन करू शकतो. संघातील प्रत्येक खेळाडू त्याचा खूप आदर करतात. अशा खेळाडूला कर्णधार केल्यास संघ एकजूट राहतो आणि त्याचा परिणाम कामगिरीमध्येही स्पष्टपणे दिसून येतो. तसेच त्याला आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करण्याचा अनुभवही आहे.
3) कर्णधारपद मिळाल्यास भुवनेश्वरचा आत्मविश्वास देखील वाढेल –
भुवनेश्वर बऱ्याच काळापासून दुखापतीशी झगडत आहे. त्याला सातत्याने खेळण्याची संधी मिळालेली नाही. दुखापतीमुळे तो सतत संघातून आत आणि बाहेर होत आहे. अशा परिस्थितीत जर त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले तर त्याचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल, आणि आत्मविश्वास वाढल्यास भुवनेश्वर आणखीनच उत्तम कामगिरी करु शकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
इरफान पठाणने कंगणा राणावतला घेतले फैलावर, केले ‘असे’ ट्विट
नाव काढल पोरीने! अवघ्या सतराव्या वर्षी शेफाली वर्मा खेळणार ‘ही’ प्रतिष्ठीत स्पर्धा
आयपीएल २०२१ स्पर्धा रद्द होऊनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळणार १०० कोटींहून अधिक रक्कम, ‘हे’ आहे कारण