भारतीय क्रिकेट संघ हा जगातील एक सर्वोत्कृष्ट संघ आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आपली जागा बनवण्यासाठी सध्या खेळडूंमध्ये जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे आणि संघात संधी मिळणारे खेळाडू आपल्या परीने उत्तम प्रदर्शन करताना दिसतात. अशा परिस्थितीत भारतीय संघातील खेळाडूंमध्ये स्पर्धेची ही लढाई फार कठीण झाली आहे. त्यातही काही खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात उत्तम आहेत.
तसेच अजूनही असे काही खेळाडू आहेत जे एका विशिष्ट स्वरूपात सामर्थ्य दाखविण्यात पारंगत आहेत. या लेखात अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे वनडे क्रिकेटमधले जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु टी -२० स्वरूपात ते चांगली कामगिरी करत नाहीत. किंवा त्यांना आता टी२० मध्ये संधी मिळणे कठिण झाले आहे.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
भारतीय क्रिकेट कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात खास खेळाडू आहे. अजिंक्य रहाणेने मागील काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवत आहे.
क्रिकेटमधील या दमदार खेळाडूला वनडे संघात नियमितपणे संधी मिळत नाही. असे असतानाच आता तो टी-२० क्रिकेटमध्ये फिट होऊ शकेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत रहाणेने टी-२० क्रिकेट खेळणे कमी केला पाहिजे. त्याने आतापर्यंत ९० वनडे सामने तर २० टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत.
केदार जाधव (Kedar Jadhav)
केदार जाधव हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो फलंदाजीसोबतच पर्यायी गोलंदाज म्हणून देखील संघासाठी उपयुक्त ठरला आहे.
केदार जाधव गेल्या काही वर्षापासून भारतीय वनडे संघाचा नियमित खेळाडू राहिला आहे. तसेच तो उत्कृष्ट प्रदर्शनही करीत आहे. परंतु भारतीय टी-२० संघात काही चांगले अष्टपैलू खेळाडू आल्यामुळे, केदारला भारतीय टी-२० संघात नियमित संधी मिळत नाही. म्हणूनच केदारने आता वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
त्याने अजूनही कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केले नसले तरी ७३ वनडे सामने आणि फक्त ९ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)
यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात प्रवेश केला. त्याने पुनरागमन धमाकेदार केले आणि तो वनडे संघासाठी तंदुरुस्त दिसत आहे. दिनेश कार्तिक वनडे संघात आपली क्षमता दाखवत आहे, पण टी-२० संघातील युवा खेळाडूंच्या शानदार कामगिरीमुळे कार्तिकला स्थान मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत वनडे संघात स्थान निश्चित करण्यासाठी कार्तिकला टी-२० क्रिकेटला रामराम करावे लागू शकते.
उमेश यादव (Umesh Yadav)
या यादीत फलंदाजांसोबतच गोलंदाजांचाही उल्लेख आहे. विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव, भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजीचा प्रमुख आहे. तो कसोटीमधील एक चमकदार गोलंदाज आहे. उमेश यादव कदाचित वनडे संघात नियमित खेळत नसला तरी वनडे क्रिकेटमधील त्याची कामगिरी पाहता त्याला कमी लेखू शकत नाही.
उमेश यादव एक उत्तम गोलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे, परंतु त्याने कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी टी-२० क्रिकेट सोडून दिले तर कदाचीत त्याला फायदा होऊ शकतो.
मोहम्मद शमी (Mohammed Shami)
स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारसह भारतीय संघात प्रवेश करून प्रभावी पदार्पण करणारा मोहम्मद शमी आपल्या कारकीर्दीत बऱ्याचदा दुखापतग्रस्त राहिला आहे. मोहम्मद शमी एक जबरदस्त गोलंदाज आहे. कसोटीसाठी उपयुक्त असलेल्या मोहम्मद शमीला वनडे क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही. परंतु त्याने ७७ वनडे सामन्यात १४४ बळी मिळवले आहेत. तर ११ टी-२० सामन्यात त्याने फक्त १२ बळी मिळवले आहेत. यावरूनच असे लक्षात येते की शमीला टी२०मध्ये सातत्याने संधी मिळत नाही. त्यामुळे तो टी२० कारकिर्दीपेक्षाक वनडे आणि कसोटीकडे लक्ष केंद्रित करु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं
रिकी पॉन्टिंगने ‘या’ दोन भारतीय क्रिकेटपटूंचे केले तोंडभरुन कौतुक; म्हणाला…
आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार
-आयपीएल २०२०: यंदा हे ३ संघ असतील सर्वात कमजोर; धोनीच्या सीएसकेचाही समावेश!
-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज