इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. आयपीएलमुळे भारताच्या युवा खेळाडूंना जगातील महान खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली.
बीसीसीआयने जवळपास एका दशकांपूर्वी आयपीएलची सुरुवात केली आणि नवीन खेळाडूंना संधी देणे हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट होते. आयपीएलने युवा खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले, तर भारतीय संघातील अनेक आऊट ऑफ फॉर्म खेळाडूंना आयपीएलमधील उत्तम कामगिरीमुळे पुन्हा संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांना भारतीय संघातून वगळल्यानंतर आयपीएलमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली, परंतु वयामुळे त्यांच्याकडे संघ व्यवस्थापनेने दुर्लक्ष केले. यामुळे या लेखात अशा ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही, त्यांना संघात पुनरागमन करण्याची संधी मिळणार नाही.
५. अमित मिश्रा (Amit Mishra)
अमित मिश्राने आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आयपीएल कारकीर्दीत अमित मिश्राने १४७ सामने खेळले असून त्यात एकूण १५७ बळी घेतले आहेत. या ३७ वर्षीय गोलंदाजाच्या नावावर वेगवेगळ्या संघांकडून हॅटट्रिक घेण्याचा विक्रम आहे.
हा विक्रम त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना केला आहे. २०१५ च्या लिलावात दिल्लीच्या कॅपिटल्सनी अमित मिश्राला विकत घेतले. त्यानंतर तो या संघाकडून सतत खेळत असतो. २०१९ च्या हंगामात मिश्राने ११ सामन्यांत ११ गडी बाद केले.
यावेळी, त्याची सरासरी देखील २४.५५ होती, जी २०१८ च्या कामगिरीपेक्षा खराब होती. आयपीएल २०२० मध्ये ३७ वर्षांच्या या फिरकी गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतल्या तरीही भारतीय संघात त्याचे पुनरागमन होणे अशक्य आहे.
४. हरभजन सिंग (Harbhajan Singh)
हरभजन सिंग इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक आहे. हरभजन सिंगला मुंबई इंडियन्सने २००८ मध्ये विकत घेतले, त्यानंतर २०१८ पर्यंत तो मुंबईकडून सातत्याने खेळत राहिला. मात्र, ११ व्या सत्रात त्याला मुंबई इंडियन्सने सोडले आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले.
दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आयपीएल कारकीर्दीत एकूण १६० सामने खेळले असून त्यात त्याने २६.५५ च्या सरासरीने १५० बळी घेतले आहेत. २०१९ च्या हंगामात हरभजन सिंगने ११ सामन्यांत १९.५० च्या सरासरीने १६ गडी बाद केले आणि चमकदार कामगिरी केली.
आयपीएल २०२० मध्ये या ३९ वर्षीय हरभजन सिंगनेही सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविली तरी भारतीय संघात या दिग्गज खेळाडूचे पुनरागमन अशक्य आहे.
३. सुरेश रैना (Suresh Raina)
सन २०१८ मध्ये भारतासाठी अखेरचा टी-२० सामना खेळणार्या सुरेश रैनाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल २०२० मध्ये उत्तम कामगिरी करून तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. परंतु, आता रैनाला संघात स्थान मिळणे अशक्य झाले आहे.
भारतीय संघात आधीपासूनच युवा खेळाडूंनी त्यांची जागा बनवली आहे. याच कारणाने रैना पुनरागमन करणे शक्य नाही. रैना त्याच्या काळात मधल्या फळीतील भारताचा सर्वोत्कृष्ट फलंदाज होता, परंतु आता तो बर्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत त्याचे संपूर्ण लक्ष आयपीएल २०२० वर होते.
जेणेकरून याद्वारे तो ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवू शकेल. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टी-२० विश्वचषक २०२० रद्द झाल्याने संघात पुनरागमन करण्याच्या त्याच्या स्वप्नालाही ब्रेक लागले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
३. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)
दिनेश कार्तिक हा गेल्या दोन सत्रापासून कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत आहे. एकूण ६ आयपीएल संघातून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये सलामीपासून ते सहाव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली आहे. परंतु आतापर्यंत तो आयपीएलमध्ये शतक देखील ठोकू शकलेला नाही.
आयपीएल २०२० वर भविष्य टिकून असणाऱ्या खेळाडूंपैकी एक भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांचे नाव आहे. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेपासून दिनेश कार्तिकला मर्यादित षटकांच्या स्वरूपात संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून टी-२० विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करण्याचे स्वप्न पाहत असेल.
परंतु, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही भारतीय संघ पुन्हा एकदा दिनेश कार्तिकला संधी मिळेल असे वाटत नाही. कारण या संघात आधीच संजू सॅमसन, रिषभ पंत आणि केएल राहुलच्या रूपात तीन यष्टीरक्षक आहेत.
१. एमएस धोनी (MS Dhoni)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा भारतीय संघात पुनरागमन होण्याबाबाद अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. याचे कारण गेल्या १० महिन्यांपासून धोनी ब्रेकवर आहे. खरं तर, विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून मिळालेल्या पराभवानंतर माजी भारतीय कर्णधार मैदानापासून लांब आहे.
त्यानंतर, पुनरागमन करण्यासाठी त्याचे लक्ष आयपीएलवर होते. गेल्या विश्वचषक स्पर्धेपासूनच त्याच्या निवृत्त होण्याविषयी चर्चा सुरू झाली असली तरी त्याने कोणतीही घोषणा केली नाही. यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीने टी-२० विश्वचषकामधील त्याची कामगिरीवर लक्षात घेऊन त्याला पुढे खेळण्याची संधी दिली असती.
पण टी-२० विश्वचषक रद्द झाल्यानंतर असे म्हणता येईल की आयपीएल २०२० मध्ये धोनीने सर्वाधिक धावा केल्या तरी संघात पुनरागमन करण्याचा मार्ग कायमचा बंद झाला आहे.