पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल हे सध्या भारतीय संघाचे उदयोन्मुख युवा खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंचे भविष्य भारतीय संघात उज्ज्वल दिसत आहे. त्यामुळे नवीन युवा खेळाडूंनाभारतीय संघात स्थान मिळवणे अवघड जाणार आहे. कारण आपण पाहिलं तर या दोघेही प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना डावलून दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला स्थान देणे चुकीचे ठरेल.
आज या लेखात अशा ५ फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची क्रिकेट कारकीर्द पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांच्या कारणास्तव सुरू होण्यापूर्वीच संपू शकते.
५. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal)
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या संपूर्ण स्पर्धेत यशस्वी जयस्वालने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून असे स्पष्टपणे म्हटले जाऊ शकते की केवळ या स्तरासाठीच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरासाठीही तो सज्ज झाला आहे.
जयस्वालने स्पर्धेच्या ६ सामन्यात १३३.३ च्या उत्कृष्ट सरासरीने एकूण ४०० धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट ८२.४७ एवढा राहिला. त्याने या स्पर्धेत एकूण ४ अर्धशतके आणि १ शतक झळकावले होते.
विजय हजारे स्पर्धेत त्याने द्विशतक केले आहे. परंतु शॉ आणि गिल सारखे युवा फलंदाज भारतीय संघात असताना त्याला संधी मिळणे सध्यातरी फारच अवघड वाटत आहे.
४. रियान पराग (Riyan Parag)
रियान पराग केवळ १८ वर्षांचा आहे, परंतु त्याने या वयातच आपल्यातील कौशल्य सिद्ध केले आहेत. आयपीएलच्या मागील हंगामात राजस्थान रॉयल्सकडून त्याने ७ सामने खेळले होते. त्यामध्ये ३२ च्या उत्कृष्ट सरासरीने त्याने १६० धावा केल्या. त्याचबरोबर त्याने ८.८४ च्या सरासरीने २ बळीही घेतले होते.
परंतु रियानसारख्या उदयोन्मुख युवा फलंदाजावरही शॉ आणि गिल हे आगामी काळात नक्कीच भारी ठरणार आहेत. खरंतर या दोन फलंदाजांमुळे रियानला भारतीय संघात स्थान मिळविणे खूपच कठीण जाणार आहे.
३. नितीश राणा (Nitish Rana)
दिल्लीचा युवा फलंदाज नितीश राणा देखील सतत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलमध्येही त्याने आपली प्रतिभा जगासमोर दाखविली आहे.
त्याने आयपीएलमधील ४६ सामन्यात २९.३२ च्या चांगल्या सरासरीने १०८५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ७ विकेट्सही घेतल्या आहेत.
परंतू शॉ आणि गिल सारख्या फलंदाजांना राणा अगोदर प्रथम प्राधान्य मिळत असून भविष्यातही असेच घडण्याची शक्यता आहे.
२. ईशान किशन (Ishan Kishan)
ईशान किशनने आयपीएल आणि झारखंडसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो टी२० स्पेशल खेळाडू मानला जातो. असं असतानाही त्याला आतापर्यंत एकही सामना भारतीय संघाकडून खेळण्यासाठी मिळालेला नाही.
ईशान हा शॉ आणि गिल सारखा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. परंतू या दोघांपेक्षा त्याच्याकडे कमी प्रतिभा आहे. निवडकर्त्यानाही हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संघात स्थान मिळविणे इशानसाठी जवळजवळ अशक्य आहे.
१. मयंक अगरवाल (Mayank Agarwal)
जरी मयंक अगरवालने न्यूझीलंड दौर्यावर धावा जमवल्या नसल्या, तरी प्रत्येकाला त्याच्या कौशल्याची जाणीव आहे. तो भारताच्या कसोटी संघासाठी सतत धावा करत आहे. अशा परिस्थितीत त्याला वनडे आणि टी२० क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अधिक संधी मिळाल्या पाहिजेत, असे म्हटले जात आहे. तो एक आक्रमक खेळाडू आहे, जो संघाला स्फोटक सुरुवात करून देण्यास सक्षम आहे.
तरीही मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मयंकची निवड न करणे, निवड समितीचा चुकीचा निर्णय असल्याचे दिसते. परंतु शॉ आणि मयंक या दोघांची नावे आफ्रिकेबरोबरच्या कसोटी मालिकेत घेण्यात आली. यावरून अंदाज बांधता येतो की शॉ आणि गिलमुळे त्याची पुढे जाणारी क्रिकेट कारकीर्द खूप कठीण ठरणार आहे.
वाचनीय लेख-
-आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे कोच झालेले ५ दिग्गज
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
-जगातील सर्वात श्रीमंत ५ क्रिकेटर्स; विराट आहे ‘या’ क्रमांकावर…