टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला . या सामन्यात विराट कोहली याने सर्वाधिक 82 धावा केलेल्या. मात्र, या सामन्यात विराटचया बॅटमधून एक फटका बघायला मिळाला ज्याची दखल खुद्द आयसीसीने घेतली. 19व्या षटकात गोलंदाज हॅरीस रौफ याच्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार मारला. याच षटकाराला आयसीसीने सामन्याची दिशा बदलणाऱ्या 5 क्षणांच्या यादीत स्थान दिले आहे.
चीरकाळ लक्षात राहिल पाकिस्तान विरुद्ध खेळलेला डाव
विराट कोहलीने या विश्वचषकात अनेक चांगले डाव खेळले. मात्र, पाकिस्तान विरुद्ध खेळलेली त्याची नाबाद 82 धावांची खेळी सदैव चाहत्यांच्या स्मरणात राहिल. भारताने या टी20 विश्वचषकात आपला पहिला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध खेळलेला. या सामन्यात असा एक क्षण आला जेव्हा सर्वांना वाटलेले की भारताच्या हातून हा सामना निसटणार. मात्र, या अवघड परिस्थितीत कोहली संघासाठी संकटमोचक ठरला आणि या अशक्य वाटणारे हे आव्हान पार सुद्धा केले. शेवटच्या काही षटकात विराटच्या बॅटमधून असा फटका बघायला मिळाला, ज्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.
Ye six kitni bar aaya sapne me…pakistan team ke har ek player ke sapne me aata hota hoga virat kohli ???????????????????? pic.twitter.com/mMwFvHPnC4
— Onkar Ganjave (@OnkarGanjave) November 13, 2022
भारताला हव्या होत्या 8 चेंडूत 28 धावा
भारताला शेवटच्या 8 चेंडूत 28 धावांची गरज होती आणि विराट स्ट्राईकवर होता. त्यानंतर विराटने 19व्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. त्यानंतर टाकण्यात आलेले शेवटचे षटकात देखील नाटकीय ठरले आणि शेवटी भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला.
या सामन्यात विराटने 19व्या षटकात जे षटकार लगावले त्यातल्या एक षटकाराला आयसीसीने विशेष महत्व दिले आहे. विराट कोहलीने हा षटकार हॅरीस रौफ (Haris Rauf) याच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार लगावला. असा षटकार पाहून अनेक दिग्गज आश्चर्यचकीत झाले आणि या षटकाराला आयसीसीने सामन्याची दिशा बदलवणाऱ्या टॉप 5 क्षणांमध्ये जागा दिला आहे.(ICC has recognised Virat Kohli’s six to Haris Rauf as a memorable moment)
भारताचा या स्पर्धेत पराभव जरी झालेला असला तरी भारताच्या काही खेळाडूंनी अतिशय चांगले प्रदर्शन केले, त्यातलाच एक खेळाडू म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). गेल्या काही काळापासून खराब प्रदर्शन करणाऱ्या विराटने आधी आशिया चषकात आणि त्यानंतर टी20 विश्वचषकात आपल्या बॅटने मैदानात आग ओकली.भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचण्यात अपयश आले पण विराट कोहली टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायकल वॉन विरुद्ध भारतीय संघ! हार्दिक पंड्याचे माजी इंग्लिश कर्णधाराला प्रत्युत्तर
बाबर आझमचा अपमान करणे पडले महागात, पाकिस्तानी ‘या’ खेळाडूला मिळाली कायदेशीर नोटीस