नव्या वर्षात सुरू होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा तर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या हा करताना दिसेल. असे असताना या संघात अनेक महत्त्वाचे बदल पाहण्यास मिळाले. संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेल्या भुवनेश्वर कुमार याला या संघात जागा मिळालेली नाही. संघ व्यवस्थापन आता भविष्यात युवा गोलंदाजांवर विश्वास ठेवणार असल्याचे संकेत याद्वारे मिळत आहेत.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळाली आहे. दुसरीकडे अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार यांच्याकडे टी20 मालिकेत वेगवान गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. मागील दहा वर्षापासून भारतीय संघाचा सदस्य असलेल्या भुवनेश्वर याला या दोन्ही संघात जागा बनवण्यात अपयश आले.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, निवड समिती बैठकीत भुवनेश्वर कुमारच्या नावावरही चर्चाही झाली नाही. त्यामुळे स्पष्टपणे संकेत मिळत आहेत की, भुवी आता बीसीसीआयच्या पुढच्या योजनेचा भाग नाही. भुवीसाठी हे वर्ष फारसे चांगले राहिले नाही. दुखापतीनंतर त्याला टी20 संघात स्थान मिळाले. परंतु, तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. यंदाच्या आशिया चषक आणि टी20 विश्वचषकातील त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले. विश्वचषकात भुवीच्या खात्यात फक्त चार बळी होते. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याने दोन सामने खेळले. यात तो केवळ एकच बळी मिळवू शकलेला.. तेव्हापासूनच त्याला भविष्यात भारतीय संघात जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात होते.
(Bhuvneshwar Kumar Dropped From India Limited Overs Team Against Srilanka)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप