आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा अंतिम सामन्यात पोहोचणारा संघ म्हणजे, ‘चेन्नई सुपर किंग्स’. मात्र यावर्षी याच चेन्नई संघाची गाडी डगमगली आहे. त्यातही सोमवारी (१९ ऑक्टोबर) अबु धाबीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यात चेन्नईला ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे माजी क्रिकेटर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने चेन्नईवर टीका केली आहे.
आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला की, “चेन्नई एक्सप्रेस आता मालगाडी बनली आहे. कारण ती खूप हळूहळू चालत आहे. राजस्थानविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आता त्यांनी उर्वरित ४ सामने जिंकले तरी त्यांचे एकूण १४ गुण होतील. त्यामुळे गुणतक्यात टॉप-३ संघांच्या जवळपास पोहोचणे त्यांच्यासाठी खूप अवघड आहे.”
“सुरुवातीला मला वाटत होते की, चेन्नईसाठी १४ गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे शक्य होईल. पण आता हे खूप कठीण असेल. कारण मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या टॉप-३ संघांना सोडून, कोलकाता नाईट रायडर्सही या शर्यतीत सहभागी झाली आहे. त्यामुळे चेन्नईसाठी आता हा हंगाम संपल्याप्रमाणेच आहे,” असे पुढे बोलताना चोप्राने म्हटले.
एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघाने आयपीएलच्या १३व्या हंगामात १० सामने खेळले असून केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर ७ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे ६ गुणांसह हा संघ गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हमसे पंगा पडेगा मेहंगा! चौकार मार म्हणून खोड काढणाऱ्या अख्तरला सेहवागचा जबरा पलटवार
शिखर ‘द वन’..! सलग २ सामन्यात शतक ठोकत घडवला इतिहास
नेमकं चाललंय तरी काय! करोडो रुपये देऊन संघात घेतलेले खेळाडूच ठरले सपशेल फ्लॉप
ट्रेंडिंग लेख-
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले