भारतात क्रिकेटपटूंना मोठ्या सेलिब्रेंटींसारखी वागणूक नेहमीच मिळत आली आहे. त्यामुळे त्यांच्या मैदानातील कामगिरीबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा रंगते. तसेच लाखो-करोडो चाहते त्यांची एक झलक प्रत्यक्ष पाहाण्याच्या प्रयत्नात असतात. अशीच चर्चा गेल्या काही महिन्यांपासून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरची होत आहे. नुकताच त्याला मुंबईतील एका कॅफेच्या बाहेर पाहाण्यात आले.
मुंबईतील कॅफेच्या बाहेर दिसला अर्जून
अर्जून वांद्रा, मुंबई येथील फार्मर्स कॅफेमधून त्याच्या मित्रपरिवारासह बाहेर येताना दिसला. यावेळी त्याला पॅपराजींनी आपल्या कॅमेरात कैद केले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अर्जून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा लोगो असलेला शर्ट आणि शॉर्ट्सवर दिसत आहे. तो कॅफेच्या बाहेर येऊन मित्रांना भेटून त्याच्या कारमध्ये बसल्याचे दिसते.
अर्जूनची नुकतीच अगामी देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने घोषित केलेल्या ४५ खेळाडूंच्या फिटनेस कॅम्पमध्ये निवड झाली आहे. त्याच्यासह या कॅम्पसाठी रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ अशा स्टार खेळाडूंचीही निवड झाली आहे.
अशी राहिली आहे अर्जूनची कामगिरी
अर्जून हा प्रामुख्याने गोलंदाज असून तळात फलंदाजीही करु शकणारा अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याने याचवर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत अनेक वयोगटातील सामने खेळले आहेत. तसेच वरिष्ठ देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने २ ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. यात त्याला २ विकेट्स घेण्यात यश आले आहे. (Arjun Tendulkar was spotted outside Farmers Café in Bandra, Mumbai)
तसेच अर्जूनने आयपीएलमध्येही यावर्षी पाऊल टाकले आहे. त्याने आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी नाव नोंदवले होते. त्यामुळे लिलावादरम्यान त्याला त्याच्या २० लाखांच्या मुळ किंमतीत मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित होईपर्यंत अर्जूनला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता हे पाहावे लागेल की सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत होणाऱ्या उर्वरित आयपीएल २०२१ हंगामात त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळणार का.
महत्त्वाच्या बातम्या –
“हार्दिकला भारताचा कर्णधार न केल्याचे वाईट वाटले, तो चांगला पर्याय ठरला असता”