बांगलादेश हा असा एकमेव देश आहे जिथं भारतीय संघाला अजिबात पाठींबा मिळत नाही, असे वक्तव्य भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने केलं आहे.
बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बालशी फेसबुक लाईव्ह दरम्यान बोलताना रोहितने हे वक्तव्य केलं असून बांगलादेश क्रिकेटमधील एक चांगला संघ होतं असल्याचे वक्तव्यही रोहितने केले.
“भारतात व बांगलादेशमध्ये क्रिकेटवेडे अनेक चाहते आहेत. आपण चुका केल्या तर चाहते आपल्यावर जोरदार टीका करतात. बांगलादेशमध्ये क्रिकेटचे अनेक कट्टर चाहते आहेत. मी पाहिलं आहे की जेव्हा बांगलादेशमध्ये आम्ही खेळतो तेव्हा आम्हाला अजिबात पाठींबा मिळत नाही,” असे यावेळी रोहित तमिमला म्हणाला.
२०१५ व २०१९ क्रिकेट विश्वचषक व २०१७ आयसीसी चॅंम्पियन्स ट्राॅफीमध्ये रोहितने बांगलादेशविरुद्ध शानदार शतकी खेळी केल्या आहेत.