मुंबई । जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड समजल्या जाणाऱ्या बीसीसीआयला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बीसीसीआयबरोबरच वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे क्रिकेट बोर्ड देखील आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यांनाही बीसीसीआयकडून मदतीची अपेक्षा आहे. दरम्यान एक माहिती समोर येत आहे की, भारतीय संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवनसमवेत अन्य खेळाडूंना गेल्या दहा महिन्यांपासून पगार दिलेला नाही.
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून पगार दिलेला नाही. इतकेच नाही तर डिसेंबर 2019 पासून बोर्डाने 2 कसोटी, 9 वनडे आणि 8 टी20 सामन्यांची फीदेखील दिली नाही. बीसीसीआयने 27 भारतीय खेळाडूंशी करार केला आहे.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार, बीसीसीआयला या करार झालेल्या खेळाडूंना सुमारे 99 कोटी रुपये द्यायचे आहेत. बीसीसीआयने अखेर वर्ष 2018 मध्ये बॅलन्सशीट जारी केली होती, त्यानुसार मार्च 2018 पर्यंत त्यांच्याकडे 5526 कोटी रुपयांची रोकड आणि बँक शिल्लक होता. त्यापैकी बीसीसीआयने 2992 कोटींची एफडी केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे एप्रिल 2018 मध्ये बीसीसीआयने पाच वर्षाच्या सामना प्रक्षेपणासाठी स्टार इंडियाबरोबर 6138 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्याचबरोबर, बीसीसीआयच्या करारातील 8 क्रिकेटपटूंनी सांगितले की त्यांना गेल्या 10 महिन्यांपासून पगार मिळाला नाही.
बीसीसीआय तीन श्रेणींमध्ये खेळाडूंशी करार केला आहे. ज्यात ए प्लस ग्रेडमधील विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना वार्षिक 7 कोटी रुपये वेतन मिळते. ए ग्रेडमध्ये असणार्यांना 5 कोटी, बी ग्रेडमधील खेळाडूंना 3 कोटी आणि सी ग्रेड क्रिकेटपटूंना एक कोटी रुपये मिळतात. या दरम्यान, खेळाडूंना प्रत्येक कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडे सामन्यांसाठी 6 लाख रुपये आणि टी20 साठी 3 लाख रुपये सामना फी मिळते.
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने बदलले देशांतर्गत क्रिकेटचे नियम, आता कोचिंग करण्यासाठी आहे या वयाची अट
-गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लॉप ठरलेले क्रिकेटर या वेळी होऊ शकतात हिरो
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…