भारतीय क्रिकेटवर्तुळात महिला व पुरुष क्रिकेटपटूंमध्ये भेदभाव करण्यात येतो, असे नेहमी म्हटले जाते. खेळण्यासाठी मिळणाऱ्या सामन्यांपासूनच ते सुविधांपर्यंत महिलांना नेहमी दुय्यम स्थान देण्यात येते असे दिसून आले आहे. भारतीय महिलांना वार्षिक करारात देण्यात येणाऱ्या रकमेवरून वातावरण गरम असतानाच आता आणखी एका प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व महिला क्रिकेटपटू आमने-सामने येऊ शकतात.
हे आहे प्रकरण
भारतीय महिला क्रिकेटपटू व बीसीसीआय हे समोरासमोर येण्यासाठी मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेला टी२० विश्वचषक कारणीभूत आहे. या विश्वचषकात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. मात्र, अंतिम फेरीत संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला व स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
या स्पर्धेत उपविजेते ठरल्यानंतर आयसीसीकडून या संघाला ५ लाख डॉलर्स इनाम देण्यात येतो. आयसीसीने स्पर्धा संपल्यानंतर दोन आठवड्यांच्या आतच ही रक्कम बीसीसीआयकडे वर्ग केली होती. परंतु, बीसीसीआयने हे बक्षीस खेळाडूंना वितरित केले नाही. संघातील सर्व १५ खेळाडूंना प्रत्येकी ३३ हजार डॉलर्स यातून मिळणार आहेत. याबाबतचा खुलासा झाल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय संघाने केला होता अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास
हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतीय संघाने दमदार सुरुवात केलेली. त्यानंतर बांगलादेश, न्यूझीलंड व श्रीलंकेवर मात करत भारतीय संघाने उपांत्य फेरी पर्यंतचा प्रवास केला. उपांत्य सामन्यात पाऊस आल्याने इंग्लंड विरुद्धचा हा सामना पूर्ण झाला नाही व भारताला अंतिम फेरीत जागा मिळाली. अंतिम फेरीत मेग लेनिंगच्या नेतृत्वातील यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला एकतर्फी पराभूत करत विश्वचषक उंचावला.
महत्त्वाच्या बातम्या –
जागतिक कुस्ती दिनीच भारताच्या अव्वल कुस्तीपटूला अटक, सहा राज्यांमध्ये होता फरार
मन जिंकणारं व्यक्तव्य! मोहम्मद कैफने अनिल कुंबळेबद्दल दिली अशी काही प्रतिक्रिया की चाहतेही झाले खूश
ठरलं तर! शाहिन आफ्रिदीच होणार शाहिदचा जावई, स्वत:च केली घोषणा