क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी(2 जानेवारी) जाहीर केलेल्या एका पोस्ट नुसार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, नवदीप सैनी व रिषभ पंत यांनी जैव सुरक्षिततेचे नियम मोडले अथवा नाही याची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर मात्र बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या नियमाबद्दल नाराजी व्यक्त करत, याचे वाईट परिणाम होऊ शकतात असे स्पष्ट केले.
शुक्रवारी हे सर्व 5 क्रिकेट खेळाडू मेलबर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. तेव्हा नवलदिप सिंग नामक एका भारतीय क्रिकेट रसिकाने खेळाडूंना कल्पना नसताना त्यांचे हॉटेल बिल भरले. या प्रसंगाची माहिती नवलदिप सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली. काही वेळातच हे ट्विट प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यानंतर मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जैव सुरक्षित वातावरणाचे नियम खेळाडूंनी मोडले अथवा नाही, याची चौकशी करण्याचा आदेश देऊन या 5 खेळाडूंना उर्वरित भारतीय संघापासून वेगळे केले आहे. या 5 खेळाडूंना वेगळ्या जैव सुरक्षित वातावरणामध्ये सराव करण्याची मुभा देण्यात आली आहे.
या सर्व प्रसंगाबद्दल बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “खेळाडू हॉटेलच्या बाहेर होते, व पावसामुळे ते आत गेले. तिसर्या कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी असे केले गेले असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य आहे “.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खेळाडूंच्या पुढील सामन्यातील उपस्थितीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “पहिली बाब म्हणजे त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुसरे म्हणजे, आम्हाला वाटत नाही की हे सर्व प्रकरण इतके मोठे होइल. कारण असे झाल्यास याचे विपरीत परिणाम होतील.”
दरम्यान हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, 7 जानेवारीपासून सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी या खेळाडूंना खेळण्याची मुभा मिळते अथवा नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
नक्की त्या चाहत्याने असे रोहित पंतच्या हाॅटेल बीलाचे पैसे दिले तरी किती?
‘या’ कारणामुळे चालत नाहीये स्टीव्ह स्मिथची बॅट, लॅब्यूशानेने केला खुलासा
‘तो’ क्रिकेटपटू भारतीय गोलंदाजांचा कर्णधार, माजी दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा