जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतातील सर्वच प्रमुख क्रिकेटपटू खेळत असतात. आयपीएल दरम्यान खेळाडूंच्या दुखापतीदेखील वाढलेल्या दिसतात. आधीच काही प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला आगामी विश्वचषकाच्या तोंडावर या दुखापती परवडणाऱ्या नाहीत. याच कारणाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सध्या भारतीय संघात सातत्याने खेळत असलेल्या खेळाडूंवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य फिजिओ नितीन पटेल व ट्रेनर सोहम देसाई यांनी आयपीएलमधील सर्व संघांच्या फिजियो व ट्रेनरसोबत ऑनलाइन संवाद साधला. यामध्ये त्यांनी सध्या भारतीय संघातून खेळत असलेल्या खेळाडूंबाबत सातत्याने अपडेट देण्याची सूचना केली. विशेष म्हणजे या चर्चेला बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा हे देखील हजर होते. बीसीसीआयने यापूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला देखील याबाबतच्या सूचना केल्या आहेत.
भारतीय संघाची नजर सध्या आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व वनडे विश्वचषकावर आहे. आयपीएल समाप्त झाल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. तर, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक भारतातच होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मुख्य खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असणे आवश्यक असल्याने, बीसीसीआय प्रयत्नशील असल्याचे दिसते.
सध्या भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व फलंदाज श्रेयस अय्यर हे पाठीच्या दुखापतीमुळे कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाहीत. हे दोघेही भारतीय संघाचे नियमित सदस्य असल्याने, त्यांची गरज विश्वचषकात संघाला असेल.
(BCCI Talk With All IPL Franchise On Players Work Load Management Ahead WTC Final And ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या विजयाला वादाची काळी किनार! शफालीला बाद देण्यावरून उलटसुलट चर्चा सुरू
नॅट सिव्हरची पैसा वसूल कामगिरी! 3.20 कोटींच्याच दर्जाचा खेळ दाखवत बनवले मुंबईला चॅम्पियन