जगभरातील सर्वात मोठी टी२० लीग म्हणजेच आयपीएलच्या आयोजनावर आतापर्यंत संकटाचे सावट पसरले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांमधील संक्रमण वाढत आहे. तसेच भारतात चौथे लॉकडाऊनदेखील लावण्यात आले आहे.
असे असले तरीही खेळाडूंना स्टेडियममध्ये सराव करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. तरीही आयपीएलचे (IPL) आयोजन केव्हा होईल हे सांगणे कठीण आहे. परंतु ज्याप्रकारे परिस्थिती होणारी सुधारणा होत आहे, तसेच आयपीएलदेखील सुरु होण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या वाटेत असणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे टी२० विश्वचषक (T20 World Cup), जो ऑस्ट्रेलियामध्ये सप्टेंबर- ऑक्टोबरदरम्यान सुरु होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकापूर्वी आयपीएलचे आयोजन करण्याची शक्यता कमी आहे. भारतात आयपीएल मार्चपासून सुरु होऊन मेमध्ये संपत होती, त्यानंतर भारतात मान्सून सुरु होऊन सामने जवळपास बंद होत असायचे.
टी२० विश्वचषकाचा धोका अद्याप टळलेला नाही. २८ मेला आयसीसीच्या सदस्यांची एक बैठक होणार आहे. ज्यानंतर निर्णय घेतला जाईल की, कोणत्या परिस्थितीत या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. भारतात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन संपेल. तसेच त्यापूर्वी स्पष्ट होईल की विश्वचषकाचे भविष्य काय आहे.
लॉकडाऊन (Lockdown) संपल्यानंतर त्याचा पुढचा टप्पादेखील सुरु होऊ शकतो. परंतु ज्याप्रकारे चौथ्या टप्प्यात अनेक सूट देण्यात आली होती. तसेच पाचव्या टप्प्यातही देण्याची शक्यता आहे. हे पाहता बीसीसीआय आयपीएलबद्दल मोठा निर्णय घेऊ शकते.
क्रिकेटप्रेमींना २ तारखांची वाट पहावी लागेल. ती म्हणजे, पहिली २८ मे या दिवशी आयसीसीची बैठक होणार आहे आणि दुसरी ३१ मे या दिवशी भारतातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार आहे यादरम्यान बीसीसीआयच्या सूत्रांचे असे मत आहे की, आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामाची सुरुवात २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होऊ शकते.
यासंदर्भात एका फ्रंचायझीच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले की, ते लोक पुढील रणनीतीवर काम करत आहेत. तसेच आयपीएलच्या आयोजनाबद्दल त्यांचे असे मत आहे की, सप्टेंबर महिन्याच्या शेवटीपासून ते नोव्हेंबरदरम्यान केले जाऊ शकते. कारण आयपीएलचे आयोजन करायचे असेल तर एक महिन्याची योजना असायला पाहिजे.
अधिकारी पुढे म्हणाले की, “होय, आम्हाला सांगण्यात आले आहे की, आम्ही सप्टेंबर ते नोव्हेंबर यादरम्यानच्या तारखा पाहून रणनीती बनविली पाहिजे. खरंतर आम्ही या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या योजना तयार करत आहोत.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियासाठी खुशखबर; ऑगस्टमध्ये या संघाविरुद्ध खेळणार टी२० सामने
-आशा ‘आयपीएल’ची ! भारतातील ‘ही’ चार शहरे जिथे खेळवता येतील सामने
-आता पार्थिव पटेलच म्हणतोय, या यष्टीरक्षकाला द्या विश्वचषकात संधी