साल 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रकाशझोतात आले. त्यावेळी भारताच्या त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो त्यावेळीचे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी.
आज (6 जानेवारी) कपिल देव यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यांनी भारताकडून 1979 चे 1994 पर्यंत 16 वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये 225 सामन्यात 253 विकेट्स आणि 3783 धावा केल्या तर कसोटीमध्ये 131 सामन्यात 434 विकेट्स आणि 5248 धावा केल्या.
कपिल देव यांच्याबद्दल या काही खास गोष्टी –
– कपिल देव यांचे पुर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे असून त्यांचा जन्म 6 जानेवारी 1959 मध्ये चंदीगढ येथे झाला. त्यांचे वडील रामलाल हे बिल्डींग आणि टिंबर कॉन्ट्रॅक्टर होते. कपिल देव यांचे पालक भारत-पाकिस्तान फाळणीवेळी रावळपिंडीहून स्थलांतरित झाले होते.
Here's wishing #TeamIndia's greatest all-rounder and 1983 World Cup winning Captain @therealkapildev a very happy birthday 💐🎂 pic.twitter.com/7Hgcfy49I2
— BCCI (@BCCI) January 6, 2020
– ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळले असून ते 1975 ते 1992 या 17 वर्षांच्या काळात हरियाणा संघाचे नियमित सदस्य होते.
– कपिल यांनी 1983 च्या विश्वचषकात 303 धावा आणि 12 विकेट घेतल्या होत्या. तसेच 8 सामन्यात 7 झेलही घेतले होते. त्याचबरोबर या विश्वचषकात त्यांनी झिम्बाब्वे विरुद्ध 175 धावांची नाबाद खेळी देखील केली होती.
1983, on this day, Kapil Dev bludgeoned his way to a 138-ball 175 vs Zim and 7 days later India were world champions pic.twitter.com/MHu9Ss3nxf
— BCCI (@BCCI) June 18, 2014
-फेब्रुवारी 1994 मध्ये त्यांनी श्रीलंकेच्या हर्षन तिलकरत्नेची विकेट घेत रिचर्ड हॅडली यांचा 431 विकेट्सचा विक्रम मागे टाकला. त्यांनी कारकिर्दीत कसोटीमध्ये 434 विकेट घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केले. पण त्यानंतर 8 वर्षे त्यांचा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अबाधित होता. नंतर तो विक्रम कर्टनी वॉल्श यांनी मोडला.
– कपिल देव हे वनडे क्रिकेटमध्येही सर्वाधित विकेट घेणारे गोलंदाज होते. त्यामुळे डेनिस लिली आणि मुथय्या मुरलीधरन यांच्याप्रमाणेच तेही वनडे आणि कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते.
– कपिल देव हे त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 184 डावात कधीही धावबाद झालेले नाही. सर्वाधिक सलग डावात धावबाद न होणाचा विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहे.
-कपिल देव यांना त्यांच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही दुखापतीमुळे सामन्यातून वगळण्यात आले नाही.
On Kapil Dev's birthday, re-live his greatest moment as India captain – the 1983 @cricketworldcup final win, including his stunning catch running back to dismiss Sir Viv Richards. pic.twitter.com/89H9chRRDa
— ICC (@ICC) January 6, 2019
– ते ऑक्टोबर 1999 ते ऑगस्ट 2000 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. पण त्यावेळी मॅच फिक्सिंग प्रकरण गाजल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
– त्यांनी त्यांचे तीन आत्मचरित्र लिहिले असून ‘गॉड डेक्री’ हे पहिले आत्मचरित्र 1985 मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर ‘क्रिकेट माय स्टाइल’ हे आत्मचरित्र 1987 ला प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले.
#OnThisDay One of the greatest all-rounders of all time, Kapil Dev bid adieu to Test cricket.
He signed off as the only Test player with over 4000 runs and 400-plus wickets. pic.twitter.com/4KbeUPYvZs
— ICC (@ICC) March 23, 2018
– कपिल देव हे 2018 आशिया पॅसिफिक सीनियर गोल्फ स्पर्धेतही भारताकडून सहभागी झाले होते.
– कपिल देव हे 2008 मध्ये सन्माननीय लेफ्टनंट कर्नल म्हणून भारतीय आर्मीशी जोडले गेले.
– कपिल देव यांनी काही चित्रपटात गेस्ट ऍपिएरन्स दिला आहे. यात मुझसे शादी करोगी, आर्यन: अनब्रेकेबल, चेन कूली की मेन कूली आणि इक्बाल या चित्रपटांचा समावेश आहे.
– कपिल देव यांनी रोमी हीच्याही विवाह केला आहे. त्यांनी तिला लग्नाची मागणीही अनोख्या पद्धतीने घातली होती. एकदा ट्रेनच्या प्रवासात ट्रेन एका प्रेक्षणीय स्थळी थांबली असताना त्यांनी तिला विचारले होते की तूला आपल्या मुलांना दाखवण्यासाठी या ठिकाणाचा फोटो घ्यायला आवडेल का? त्यावेळी रोमी यांना कपिल काय म्हणाले हे कळायला थोडा वेळ लागला पण त्यानंतर त्यांनी होकार दिला. कपिल आणि रोमी यांना एक मुलगी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलमन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५- लढवय्या साईराज बहुतुले!
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल