कोरोना व्हायरसमुळे जागतिक महामारीची जी समस्या उभी राहिली आहे त्यात सर्वात जास्त क्रिकेट वर्तुळात चर्चा जर कशावर होतं असेल तर ती गोलंदाजांवर. गोलंदाजांनी घाम व लाळेचा वापर चेंडूवर केला पाहिजे की नाही यावर गेले काही दिवस चर्चा सुरु आहे.
परंतु भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र यावर बंदी घातली पाहिजे, असे म्हटले आहे.
चेंडूला चकाकी मिळण्यासाठी बाहेरील कोणतीही गोष्ट वापरु दिली जात नाही. त्याला बाॅल टेंपरिंग म्हणतात. आता घाम व लाळेचाही वापर करुन तसे करु द्यायला नको आहे. आयसीसीने याबद्दल काही नियम केले पाहिजेत. तसेच काही पर्याय आयसीसीने यावर सांगितले पाहिजेत, असेही प्रसाद पुढे म्हणाले.