अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला गेलेला तिसरा टी20 सामना भारतीय संघ आणि हार्दिक पंड्या याच्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघ टी20 मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर होते. या सामन्यात पराभव झाला असता, तर भारताने 2023मधील पहिली मालिका गमावली असती. तसेच, पंड्यानेही त्याच्या नेतृत्वातील पहिला मालिका गमावली असती. मात्र, तिसरा सामना 168 धावांनी जिंकत भारताने मालिका 2-1ने खिशात घातली. या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने त्याच्या नेतृत्वाच्या यशाचे रहस्य सांगितले.
काय म्हणाला हार्दिक पंड्या?
कर्णधार हार्दिक पंड्या (Captain Hardik Pandya) याने त्याच्या नेतृत्वाच्या यशामागील रहस्याबाबत भाष्य केले. तो यावेळी म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर माझा हा मालिकावीर पुरस्कार संपूर्ण सपोर्ट स्टाफला जातो. मी नेहमीच अशाप्रकारे खेळत आलो आहे. मी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळी ज्याची आवश्यकता होता, ते केले. मी खूप आधीच नियोजन करून खेळत नाही. अधिक वेळी मी माझ्या आत्मविश्वासाच्या जोरावर काम करतो.”
‘स्वत:च्या जोरावर घेतो निर्णय’
पुढे बोलताना पंड्या म्हणाला की, “आयुष्य आणि नेतृत्वाबाबत माझा खूपच सोपा नियम आहे. जर मी पराभूत होत आहे, तर मी माझ्या निर्णयामुळेच पराभूत होईल. त्यामुळे मी नेहमी सर्व निर्णय स्वत:च जोरावर घेतो. मला जबाबदारी घेणे आवडते. जेव्हा मी आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. मला वाटले दुसरा डाव सर्वात रंजक होता. आम्हाला या दबावाच्या सामन्यांना सोपे बनवायचे आहे. आशा आहे की, आम्ही मोठ्या स्तरावरही अशीच कामगिरी करू शकू.”
WHAT. A. KNOCK ????
A maiden T20I century for Shubman Gill ????#INDvNZ | ????: Scorecard: https://t.co/CR0CCRQdoZ pic.twitter.com/2etTJZKiUj
— ICC (@ICC) February 1, 2023
अहमदाबाद टी20मध्ये मोठ्या विजयासह मालिका खिशात
भारतीय संघाने तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला 168 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करत विजय मिळवला. यादरम्यान भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना शुबमन गिल याच्या दमदार शतकाच्या जोरावर 234 धावांचे भले मोठे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या 66 धावांवर संपुष्टात आला. या सामन्यासोबतच भारताने मालिकाही खिशात घातली. विशेष म्हणजे, सामन्यातील कामगिरीसाठी शुबमन गिल याला ‘सामनावीर’ पुरस्काराने, तर मालिकेतील दमदार कामगिरीसाठी पंड्याला ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने या मालिकेत 66 धावा कुटत 5 विकेट्सही घेतल्या. (captain hardik pandya on captaincy success and player of the series award after ind vs nz t20i series)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी 2023 लकी! बलाढ्य संघांना धूळ चारत वनडे अन् टी20त रचला इतिहास, आकडेवारी वाचून वाटेल अभिमान
शानदार! आतापर्यंत जो शानदार विक्रम रैनाच्या नावावर होता, तोही शुबमनने घेतला हिसकावून