२००४ मध्ये माजी कर्णधार एमएस धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्यास सुरुवात केली. धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठी मोठे योगदान दिले आहे, हे कधीही विसरता येणार नाही.
तो (MS Dhoni) भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील आहे. त्याच्या नेतृत्वात २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारताने जिंकला.
२००७ पासून धोनीकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली. धोनी कर्णधार असताना अनेक क्रिकेटपटू असे होते, की त्यांनी भारतीय संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न केला पण त्या खेळाडूंना संघात स्थान मिळू शकले नाही.
अशाच काही भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी प्रयत्न केले, परंतु धोनीच्या काळात संघात स्थान मिळवता आले नाही, परंतु कुठेतरी त्या खेळाडूंना संधी मिळायला हवी होती.
१. इरफान पठान (Irfan Pathan)
इरफान पठाण याचे नाव भारतीय क्रिकेट इतिहासात एक हुशार आणि प्रतिभावान खेळाडू म्हणून घेतलं जात. इरफान पठाण याने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला जबरदस्त कामगिरी करून मोठे नाव कमावले.
इरफान पठाणने प्रथम सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आणि त्यानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्वात आपला जलवा दाखवला. २००३ मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने संघात पदार्पण केले.
त्याने एकूण २९ कसोटी सामने, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. तो एक ऑलराऊंडर खेळाडू होता. इरफान पठाण धोनीच्या नेतृत्वात खेळत होता, परंतु धोनीच्या नेतृत्वात संघामध्ये नियमित राहू शकला नाही. धोनीच्या नेतृत्त्वाखाली इरफानने ६२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. परंतु २०१२नंतर त्याला संधी मिळाली नाही.
२. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa)
कर्नाटकचा सलामीवीर रॉबिन उथप्पाने भारतीय क्रिकेट संघात २००६ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
उथप्पाने त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे २००७ चा वर्ल्ड कपदेखील खेळला होता, परंतु त्यानंतर धोनीने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर उथप्पाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आणि तो भारतीय संघाबाहेर गेला.
धोनीच्या नेतृत्वात उथप्पाला काही संधी मिळाल्या पण तो मिळालेल्या संधीला टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला. तो आपल्या कारकिर्दीत एकूण ४६ एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० सामने खेळाला. धोनीच्या नेतृत्त्वाखाली तो केवळ ३५ आंतरराष्ट्रीय सामने, तेही २०१२पुर्वी खेळू शकला.
३. नमन ओझा (Naman Ojha)
एमएस धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासात आजपर्यंतचा सर्वोत्तम यष्टिरक्षक ठरला आहेजोपर्यंत धोनी भारतीय संघात कायम होता तोपर्यंत अन्य यष्टिरक्षकांना भारतीय संघात जागा मिळवणे फार कठीण झाले होते.
या स्थितीत मध्य प्रदेशचा नमन ओझा देखील होता भारतीय संघात सामील होण्याची संधी शोधत होता. पण तो त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम टप्प्यात धोनी संघाचा यष्टीरक्षक आणि कर्णधार असताना आपली जागा टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला.
त्याने २०१० मध्ये श्रीलंके विरुद्ध संघात पदार्पण केलं. पण त्याच्या वाट्याला एक एकदिवसीय सामना आणि एक कसोटी सामना आला. त्याच बरोबर २ टी-२० सामने खेळाला. धोनी कर्णधार असताना त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
४. केदार जाधव (Kedar Jadhav)
भारतीय क्रिकेट संघाचा छोटा फटाका केदार जाधव या वेळी भारतीय एकदिवसीय संघाचा एक प्रमुख खेळाडू बनला आहे. परंतु केदार जाधव याच्या कारकीर्दीची सुरूवात उशीरा झाली.
त्याने २०१४ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलं. केदारला त्याच्या शानदार फॉर्मच्या वेळी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. जर केदारला वेळेवर संधी मिळाली असती तर तो आतापर्यंत भारतासाठी बरेच सामने खेळला असता.
१९८५साली जन्म झालेल्या केदारला २०१४ साली म्हणजेच धोनी कर्णधार झाल्यावर ८ वर्षांनी भारतीय संघात संधी मिळाली. २०१४ ते २०१८ या काळात धोनीच्या नेतृत्त्वाखाली केदार केवळ १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळला. धोनापेक्षा केदारला विराटच्या नेतृत्त्वाखाली जास्त खेळण्याची संधी मिळाली.
तो आतापर्यंत ७३ एकदिवसीय सामने आणि ९ टी-२० सामने खेळाला आहे. अजून त्याला कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. तो एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संघात कायम आहे.
५. अंबाती रायडू (Ambati Rayudu)
हैदराबादचा जबरदस्त फलंदाज आणि भारतीय अंडर -१९ संघाचा माजी कर्णधार अंबाती रायुडू याला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जायचे. अंबाती रायुडूने शानदार फलंदाजीचे योगदान दिले आहे.
रायुडूने धोनीच्या नेतृत्वात २०१३ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. पण धोनीच्या नेतृत्वात त्याला नियमित जागा मिळू शकली नाही. आणि आज रायुडू भारतीय संघातून बाहेर आहे.
२०१४ ते २०१८ या काळात त्याला धोनीच्या नेतृत्त्वाखाली केवळ २३ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. रायुडूने देखील मोठी प्रतिभा असताना २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
तो आतापर्यंत ५५ एकदिवसीय सामने आणि ६ टी-२० सामने खेळाला आहे. कसोटी सामन्यासाठी त्याला अजून संधी मिळाली नाही. आता तर त्याने या प्रकारातून निवृत्तीच घेतली आहे. बऱ्याच सामन्यात त्याने यष्टिरक्षकाची भूमिकाही निभावली आहे. परंतु त्याला स्वतःच स्थान टिकवून ठेवता आलं नाही.