डब्लिन | शुक्रवार, २९ जूनला झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने अपेक्षितपणे दुबळ्या आयर्लंडवर विजय मिळवला.
या विजयासह भारतीय संघाने दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडचा २-० असा पराभव करत मालिका खिशात घातली.
भारतीय संघाने या विजयाबरोबर मालिका जरी जिंकली असली तरी यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीला मात्र भारतीय क्रिकेटपटूंनी मोठ्या संकटात टाकले आहे.
पहिल्या सामन्यात रोहिश शर्मा, शिखर धवन यांनी तर दुसऱ्या सामन्यात केएल राहुल (७०) आणि सुरेश रैना (६९) उत्कृष्ट फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
गोलंदाजीतही दोन्ही सामन्यात फिरकी जोडी चहल-कुलदीप यादव यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
पहिल्या सामन्यात संधी न मिळालेल्या उमेश यादव आणि सिदार्थ यादव यांनीही या सामन्यात चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी दोन विकेट्स मिळवले.
दुसरा सामना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी संघाचा समतोल कसा साधायचा याविषयी विराटने चिंता व्यक्त केली.
सर्वच खेळाडूंनी दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाला संधी द्यायची याविषयीचा चिंता आता विराट कोहलीला लागली आहे.
“दोन्ही सामन्यात संघाच्या सर्वच विभागातून समतोल कामगिरी झाली आहे. दोन्ही सामन्यात सर्वांनीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत अंतिम अकरा जणांचा संघ निवडताना माझी डोकेदुखी वाढणार आहे.” संघ निवडी बाबतची चिंता विराटने या शब्दात व्यक्त केली.
“भारतीय संघासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मला आनंद आहे की, युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि मिळालेलली संधी दोन्ही हाताने स्विकारत आहेत. तसेच आमची राखीव खेळाडूंची फळही मजबूत असल्याचे या सामन्यात आपण पाहिले.” असे भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला.
या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडला १४३ धावांनी पराभूत केली. भारताकडून फलंदाजीत केएल राहुल ७० धावा आणि सुरेश रैनाने ६९ धावांचे योगदान दिले.
गोलंदाजीत कुलदीप यादवने १६ धावांच्या मोबदल्यात ३ तर युजवेंद्र चहलने २१ धावात ३ बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
-२०१८ रणजी स्पर्धेत खेळणार फिफा विश्वचषकापेक्षा जास्त संघ
-राहुल द्रविडचा हा सेल्फी पाहिलाय का? दोन दिग्गजांचा हा आहे…