टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघात दोन मोठे बदल घडले आहेत. विराट कोहलीने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा संघासोबतचा करार संपला आहे. शास्त्री आणि विराट यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने मागच्या काही वर्षात अप्रतिम प्रदर्शन केले आहे. मात्र, संघाला या दरम्यान एकही आयसीसी ट्रॉफी जिंकला आलेली नाही. अशात भारतीच्या विश्वविजेत्या संघाचे माजी कर्णधार कपिल देप यांनी या दोघांच्या कार्यकाळातील संघाच्या प्रदर्शनावर गुणपत्र तयार केले आहे.
कपिल देव यांनी दिलेल्या मुलाखतीत याबाबत चर्चा केली आहे. यावेळी ते म्हणाले, “मला वाटते की दोघांनी अप्रतिम काम केले आहे. मी असे समजतो की, ते भारताला एक मोठी ट्रॉफी देऊ शकले नाहीत. पण आपण मागचे पाच वर्ष पाहिले, तर जेव्हापासून विराट कोहलीने पदभार सांभाळला आहे, काहीच कमी राहिली नाहीय. आयसीसी ट्रॉफीची सर्वत मोठी कमतरता आहे. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्यांनी जेव्हा कधी दौरा केला आहे, त्यांनी दुसऱ्या संघाला मात दिली आहे.”
भारताच्या टी२० विश्वचषकातील कामगिरीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विश्वचषक नॉकआउटमध्ये पोहोचणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला वाटते की वेस्ट इंडीजमधील २००७ विश्वचषकानंतर ही टी२० विश्वचषक आहे, जेव्हा असे वाटले की भारताची कामगिरी निराशाजनक होती. जर ते पहिल्या चारमध्ये पोहोचले असते आणि नंतर पराभूत झाले असते, तर समजू शकत होतो. पण जर तुम्ही पहिल्या चार मध्ये पोहोचला नाही, तर टीका होणार,” असेही ते म्हणाले.
विराट आणि शास्त्रींच्या कार्यकाळातील भारतीय संघाच्या एकंदरीत प्रदर्शनाला कपिलने १०० पैकी ९० गुण दिले आहेत. त्यांनी यावेळी आयसीसी ट्रॉफी न मिळवल्यामुळे १० गुण कापले आहेत. ते म्हणाले की, “जर तुम्ही याला ट्रॉफीच्या दृष्टीने पाहाल, तर हे खूप वेगळे आहे. पण तुम्ही त्यांच्या क्रिकेटला पाहिले, तर ज्या दर्जाचा त्यांनी मागच्या पाच वर्षात खेळ दाखवला आहे, तर मी त्यांना १०० पैकी ९० गुण देईल. आयसीसी ट्रॉफी न जिंकल्यामुळे १० गुण कापणार आहे.”