टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची फाॅर्म टीम इंडियासाठी चिंताजनक राहिली आहे. स्पर्धेत विराट कोहली धावा करण्यात अपयशी ठरला आहे. सध्या त्याचा फाॅर्म भारतासाठी डोकेदुखी ठरत नसले तरी अंतिम सामन्यात त्याची कामगिरी भारतीय संघासठी चिंताजनक ठरु शकते. निश्चितच विरीट कोहली मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे. पण सेमीफायनल मधील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात देखील तो 9 धावांवर बाद झाला. या दरम्यान रोहित शर्मा आणि राहुल द्रविड त्याची पाठरखण करताना दिसुन आले.
इंग्लंड विरुद्ध सामन्यानंरतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला “विराट कोहली हा दर्जेदार खेळाडू आहे, त्याने 15 वर्षे क्रिकेट खेळले आहे आणि त्याचा हेतू आहे. तो फायनलसाठी त्याच्या धावा वाचवत आहे, मी त्याला पूर्ण पाठिंबा देतो” आता अश्या स्थितीत रोहितच्या प्रतिक्रियेवर भारतीय चाहते विराट कोहली कडून फायनलमध्ये मोठ्या खेळीची आपेक्षा करत आहे.
Rohit Sharma said “Virat Kohli is a class player, all players go through this, he is a big match player, the intent is there & hoping he is waiting for the final”. pic.twitter.com/oVpQt3CHC6
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
इंग्लंड विरुद्धच्य सामन्यानंतर विराट कोहली 9 धावावर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियन मध्ये निराशाजनक स्थितीत बसलेला असताना हेड कोच राहुल द्रविडनी जवळ येऊन विराटला आत्मविश्वास देताना पहायला मिळाले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rahul Dravid having a chat with Virat Kohli. pic.twitter.com/RJJ5u0J6ra
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 27, 2024
टी-20 विश्वचषक 2024 विराट कोहलीसाठी इतका वाईट जात आहे की तो आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेत 100 धावाही करु शकलेला नाही. कोहलीने या विश्वचषकात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला केवळ 75 धावा करता आल्या आहेत. या 7 डावांपैकी तो पाच वेळा दुहेरी आकडा गाठू शकला नाही आणि दोनदा शून्य धावांवर बाद झाला.
विराट कोहली उपांत्य फेरीत पहिल्यांदाच या वेळी अपयशी ठरला. याआधी विराट कोहलीने 2014 मध्ये पहिल्यांदा टी20 विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 44 चेंडूत 72 धावांची नाबाद खेळी खेळून टीम इंडियाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यानंतर 2016 मध्येही उपांत्य फेरीत भारताचा सामना वेस्ट इंडिजशी झाला होता. यावेळी विराटने 47 चेंडूत 89 धावा केल्या, मात्र त्यावेळी भारताला उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजकडून 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. 2022 टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान होते. यासामन्यात कोहलीने 40 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.
महत्तवाच्या बातम्या-
“एक अकेला सब पर भारी” अक्षर पटेल फाॅर्मात, इंग्लंड कोमात
टीम इंडिया फायनलमध्ये पोहचताच कर्णधार रोहित शर्मा भावूक, कोहलीनं सावरंल
कोहलीचा 8 वर्षापूर्वीचा गोलंदाजी रेकाॅर्ड अक्षर पटेलनं काढला मोडीत