भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरू आहे. उभय संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. तसेच, उर्वरित दोन कसोटी सामने बाकी आहेत. पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याला खास कामगिरी करता आली नाहीये. अशात इंदोरच्या होळकर स्टेडिअममध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीवर विराटच्या नजरा आहेत. विराटने काही वर्षांपूर्वी एका टीव्ही शोमध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंविषयी खुलासे केले होते. त्याने कोणत्या खेळाडूच्या पोटात गोष्ट राहत नाही, कुणाला जास्त भूक लागते, सर्वात फेकणारा कोण आहे आणि सर्वात आळशी क्रिकेटपटू कोण आहे, याचाही खुलासा केला होता.
विराट कोहली (Virat Kohli) याने कॉमेडी नाईट्स विथ कपिल (Comedy Nigts With Kapil) शोमध्ये या गोष्टींचा खुलासा केला होता. त्याने कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे बेधडकपणे दिली होती. कपिलने विराटला विचारले की, संघातील कोणत्या खेळाडूला सर्वात जास्त भूक लागते? यावर त्याने लगेच इशांत शर्मा (Ishant Sharma) याचे नाव घेतले होते. पुढे कोणत्या खेळाडूच्या पोटात गोष्ट फार काळ राहत नाही, असा प्रश्न केला असता, विराटने विचार करून पार्थिव पटेल (Parthiv Patel) याचे नाव घेतले. विराटने सांगितले की, तो इतका लहान आहे की, त्याच्या पोटात गोष्ट पचण्यासाठी जागाच नाहीये.
विराटसाठी आदर्श आहे ‘मास्टर ब्लास्टर’
शोदरम्यान विराटने सांगितले की, क्रिकेटमध्ये त्याचा आदर्श कोण आहे आणि सुरुवातीला कोणत्या खेळाडूची फलंदाजी त्याला सर्वात चांगली वाटायची. यावेळी विराटने त्याचा आदर्श ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला म्हटले. त्याने सांगितले की, सचिनसोबत खेळण्याची संधी मिळेल, याचा विचारच केला नव्हता.
विराटने सांगितले, ‘रोहितला येते सर्वाधिक झोप’
कपिलने पुढील प्रश्न विचारला की, कोणता खेळाडू मुलींपासून सर्वात लांब पळतो? यावर विराटने काही वेळ विचार करत चेतेश्वर पुजाराचे नाव घेतले. त्याने म्हटले की, “तो खूपच फोकस आणि सभ्य आहे. त्याच्यापेक्षा सभ्य व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही.” त्यानंतर कपिलने विचारले की, सर्वात जास्त बढाया कोण मारतो? यावर वेळ न घालवता विराटने रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचे नाव घेतले. त्यानंतर सर्वात जास्त झोप कुणाला येते? असा प्रश्न विचारताच विराटने जरा वेळ विचार करून रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नाव घेतले. तसेच, सर्वात आळशी खेळाडू मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला म्हटले.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्चदरम्यान खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहितकडे, तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्याकडे आहे. पॅट कमिन्स (Pat Cummins) कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतल्यामुळे कर्णधारपद स्मिथकडे आले आहे. (cricketer virat kohli spilled secret mohammed shami most lazy in team india rohit sharma loves sleeping)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युपी वॉरियर्झने WPL साठी निवडली आपली उपकर्णधार! ‘या’ भारतीय खेळाडूला मिळाला मान
पंजाबने केला आयपीएल 2023 च्या सरावाचा श्रीगणेशा! गब्बर म्हणतोय, ‘शेर आये है’