आयपीएलच्या 14 व्या सत्रातील दुसर्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीकरीता उतरलेल्या चेन्नईने 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने लक्षाचा पाठलाग करताना 18.4 षटकांत तीन गडी गमावत लक्ष्य पार केले.
या सामन्यात झालेल्या पराभवामुळे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी खूप निराश आहे. सामन्यानंतर तो म्हणाला की, दिल्लीविरुद्ध आयपीएलच्या पहिल्या सामन्यात झालेल्या खराब प्रदर्शनानंतर त्यांच्या गोलंदाजांना आपल्या चुकांमध्ये सुधार करावा लागणार आहे.
सामना संपल्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, “आम्ही खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकत होतो. परंतु गोलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणायात यश आले नाही आणि त्यांनी खूप सैल गोलंदाजी केली. त्याचा त्यांना चांगलाच धडा भेटला आहे. परंतु भविष्यात ते अधिक चांगल्या प्रकारची कामगिरी करतील.”
धोनीचे असे म्हणणे आहे की, या सामन्यात मैदानावर पडलेले दव यामुळेही खूप परिणाम झाला. तो म्हणाला, “या सामन्यादरम्यान मैदानावर पडलेल्या दवांवरती बरेच काही अवलंबून होते आणि हे लक्षात ठेवून आम्हाला शक्य तितक्या जास्तीत जास्त धावा कराव्या लागणार होत्या.”
शिखर धवन आणि पृथ्वी शॉची धडाकेबाज फलंदाजी
दिल्लीच्या या विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी खारीचा वाटा उचलला. या सामन्यात धवनने 54 चेंडूत 85 धावा कुटल्या. त्यामध्ये त्याने 10 चौकार आणि 2 षटकार खेचले. तर त्याचवेळी पृथ्वी शॉने देखील 38 चेंडूत 72 धावा करत सीएसके गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यामध्ये त्याने त्याच्या फलंदाजीमधून 9 चौकार आणि तीन षटकारांचा रतीब घातला. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 13.3 षटकांत 138 धावा फलकावर लावत आपल्या संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला होता.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार रिषभ पंत 12 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 15 धावा करून नाबाद राहिला. 18 व्या षटकातील शार्दुल ठाकूरच्या चौथ्या चेंडूवर चौकार लावत त्याने संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ
फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज
कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी