भारत आणि इंग्लंड यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने विजय मिळवला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघासमोर टी-२० मालिकेत विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ही मालिका येत्या १२ मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच चौथ्या कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणामुळे जसप्रीत बुमराहने माघार घेतली होती. तसेच तो या टी२० मालिकेसाठीही उपलब्ध नसेल. अशातच बुमराह ऐवजी अंतिम ११ जणांमध्ये कोणाला खेळवायचे, असा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनाला पडला आहे.
या मालिकेतून भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पुनरागमन करत आहे. तसेच जसप्रीत बुमराहची जागा भरून काढण्यासाठी भारतीय संघात असा गोलंदाज उपस्थित आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अवघ्या ७ धावा देत ६ गडी बाद केले होते. तो गोलंदाज म्हणजे दिपक चाहर. हा कारनामा त्याने बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता. त्याला इंग्लंड विरुद्ध अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते. त्याची टी२० मधील आत्तापर्यंतची कामगिरीही चांगली झाली आहे.
याव्यतिरिक्त संघात हार्दिक पंड्या हा अष्टपैलू म्हणून आणि फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर पार पाडू शकतात.
दिपक चाहरची कारकीर्द
पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करण्याचा विश्वविक्रम नावावर असलेल्या दिपक चहरने आतापर्यंत एकूण १३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने ७.५६ च्या इकॉनोमीने १८ गडी बाद केले आहेत. तसेच यात ७ धावा देत ६ गडी बाद करण्याचा विश्वविक्रमाचा देखील समावेश आहे. तसेच त्याने ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याला दोन गडी बाद करण्यात यश आले आहे.
असा असू शकतो पहिल्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार),शिखर धवन, रोहित शर्मा(उपकर्णधार) , केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, वाशिंग्टन सुंदर, दिपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या –
झारखंडच्या ‘या’ मंदिरात झहीरला सपत्नीक पाहून उसळली चाहत्यांची गर्दी; पाहा फोटो
कसोटी क्रमवारी: रिषभ पंतची पहिल्या १० फलंदाजांमध्ये एन्ट्री; रोहित शर्मासह ‘या’ क्रमांकावर विराजमान