मुंबई। काल(14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
हा सामना झाल्यानंतर शिखर धवन असा म्हणाला की, मधल्या षटकांमध्ये सलग चार विकेट्स गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला दहा गडी राखून पराभव स्विकारावा लागला.
“आम्ही पहिली 10-15 षटके चांगली खेळली. पण जिथे आम्ही चार विकेट्स लागोपाठ गमावल्या तिथे सामना उलटला. यानंतर आम्ही सामन्यात मागे पडलो. त्यानंतर आम्ही पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता,” असे सामन्यानंतर धवन म्हणाला,
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमध्ये शुक्रवारी(17 जानेवारी) खेळण्यात येणार आहे.
टीम इंडियासाठी खूशखबर, हा खेळाडू पुनरागमनासाठी झाला सज्ज, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/nvhjjbVVbe????#म #मराठी #Cricket #TeamIndia @PrithviShaw— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020
संपूर्ण यादी – आयसीसीकडून सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून सन्मानित झालेले क्रिकेटपटू
वाचा????https://t.co/dafpGh08x1????#म #मराठी #Cricket #TeamIndia #ICCAwards @patcummins30— Maha Sports (@Maha_Sports) January 15, 2020