आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ संदर्भातील चर्चांना खळबळ उडाली आहे. स्पर्धेला अजून दोन महिने शिल्लक आहेत. पण प्रत्येकजण त्याबद्दल बोलत आहे. चर्चा एकच, विजयाचा दावेदार कोण? कोण सर्वाधिक धावा करेल किंवा विकेट्स कोण घेईल? कोणते संघ विजयी होतील? क्रिकेट तज्ज्ञही यावर भाष्य करत आहेत आणि भारतीय यष्टीरक्षक दिनेश कार्तिक देखील याबाबतील मागे नाही. कार्तिकचा असा विश्वास आहे की, यूएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या विश्वचषकात धावा आणि विकेटच्या बाबतीत दोन भारतीय शिलेदारांचे वर्चस्व कायम राहील. त्याचबरोबर त्याने हे देखील सांगितले की, भारताशिवाय त्याला कोणत्या संघाला अंतिम फेरीत पाहायला आवडेल?
जवळपास दोन वर्षे भारतीय संघाबाहेर असलेला ज्येष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज कार्तिक अजूनही संघात परतण्याची आशा बाळगतो. पण यादरम्यान तो इंग्लंडमध्ये क्रिकेट समालोचन आणि क्रिकेट चर्चेतही सहभागी होत आहे. अशा परिस्थितीत आयसीसीच्या आगामी स्पर्धेबद्दल त्याचे विचार जाणून घेण्याची इच्छाही क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे. कार्तिकनेही या प्रकरणात चाहत्यांना निराश केलेले नाही.
भारत-वेस्ट इंडिज अंतिम सामना पाहण्याची इच्छा आहे
आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत दिनेश कार्तिकने टी२० विश्वचषकाबद्दल आपला अंदाज व्यक्त केला. कार्तिकने स्पष्ट केले की, त्याला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाहायला आवडेल. परंतु, विजेत्याबद्दल कोणताही दावा करण्यास नकार दिला.
कार्तिक म्हणाला, “मला कोण जिंकणार हे सांगायला आवडणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, मला भारत-वेस्ट इंडीजचा अंतिम सामना पाहायला आवडेल. भारतानंतर माझा दुसरा आवडता संघ निश्चितपणे वेस्ट इंडीज असेल, विशेषत: ते ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतात त्यामुळे मी त्यांना अंतिम सामन्यात पाहू इच्छितो.”
विश्वचषकात रोहित शर्मा पुन्हा चमकेल
जेव्हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा प्रश्न आला, तेव्हा त्याने भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नर यांना प्रबळ दावेदार म्हणून घोषित केले. कार्तिक म्हणाला, “दोघांनीही सलामली फलंदाजी केली आहे. दोघेही महान खेळाडू आहेत. मला दोघांपैकी एकावर पैज लावायची आहे. दोघेही धावांचे भुकेले आहेत. रोहित शर्मा आणि विश्वचषक हे एकमेकांचे पर्यायवाची शब्द आहेत. जर भारताला चांगली कामगिरी करायची असेल तर रोहितला फलंदाजी क्रमवारीच्या शीर्षस्थानी चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे.”
वरुण चक्रवर्ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे
भारताने अद्याप या स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केलेली नाही. परंतू, ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्तीची निवड होणे जवळपास निश्चित आहे आणि कार्तिक त्याच्या केकेआर साथीदार वरुणला सर्वात यशस्वी गोलंदाजाचा दावेदार मानतो. सर्वात जास्त विकेट्सच्या प्रश्नावर कार्तिक म्हणाला, “मला वरूण चक्रवर्ती नावाचा मुलगा आवडत आहे. मला असे वाटते की, त्यात काहीतरी विशेष आहे. जर भारत या स्पर्धेच्या अखेरीस गेला, तर मी ज्या मुलाबद्दल बोलत आहे त्याची त्यात मोठी भूमिका असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
चलो यूएसए! मनन, उन्मुक्तनंतर आता ‘हा’ दिल्लीकर खेळणार अमेरिकेत, भारतीय क्रिकेटला केला रामराम
‘कोहलीची आक्रमकता मर्यादित असायला हवी, नाहीतर…,’ नेमकं असं का म्हणाले माजी क्रिकेटर
राष्ट्रप्रेम!! राशिदने मैदानावर केलेल्या ‘त्या’ कृत्याने जिंकले कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांचे मन