भारतीय क्रिकेट संघांच्या जर्सीचे (Indian Cricket Team Jersey) रविवारी (18 सप्टेंबर) अनावरण करण्यात आले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अन्य खेळाडूंनी याचा प्रोमो देखील शूट केला होता. जर्सीचे निर्माते असलेल्या एमपीएल स्पोर्ट्सने इंस्टाग्राम लाईव्हद्वारे मुंबईतील एका कार्यक्रमात ही जर्सी लॉन्च केली. भारतीय महिला आणि पुरूष या दोन्ही संघासाठी ही जर्सी आहे. या जर्सीमध्ये दोन्ही क्रिकेट संघाचे अनेक दिग्गज खेळाडू दिसत आहेत. मात्र विराट कोहली हा त्यामध्ये नव्हता यामुळे चाहते संतप्त झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपला रागही व्यक्त केला आहे.
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाआधी (T20 World Cup) भारतीय संघ आपली नवी जर्सी लॉन्च करणार होता. सर्व संघ नियमितपणे प्रत्येक विश्वचषकाआधी नवी जर्सी बनवतात. 2020 पासून भारतीय संघाचे जर्सी स्पॉन्सर एमपीएल स्पोर्ट्स आहेत. त्यांनीच ही नवी जर्सी बनवली. ही जर्सी अधिकतर आकाशी निळ्या रंगाची असून, 2020 नंतर प्रथमच भारतीय संघ अशी जर्सी परिधान करेल. तसेच खांद्यावर गडद निळ्या रंगाचा भाग राहील.
जर्सीचे अनावरण झाले तेव्हा पुरूष संघाकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता. तर यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दिसले नाही. तर महिलांमध्ये स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) दिसली नाही. विराट न दिसल्याने चाहत्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ट्वीट्स करत आपला राग दर्शविला आहे. हे चाहते एकच प्रश्न करत आहेत, ‘विराट कोहली यामध्ये का नाही?’
एका चाहत्याने ट्वीटमध्ये लिहिले, ‘बीसीसीआयने जर्सीचे अनावरण करताना विराट कोहलीला घेतले नसले तरी क्रिकेटच्या चाहत्यांनी माहित आहे 18 क्रमांकाचीच जर्सी सर्वाधिक विकली जाणार.’
BCCI might not feature Virat Kohli in the new jersey launch but everyone who follows this sport knows it's the jersey number 18 that will be bought by maximum fans.#ViratKohli𓃵 @imVkohli
— SASHIKANTA LENKA (@LenkaSashikanta) September 18, 2022
नवीन जर्सीमध्ये भारताचा पुरूष संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत खेळणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका मंगळवारपासून (20 सप्टेंबर) सुरू होत आहे. हा सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पंत आणि कार्तिक दोघेही…’, भारतीय यष्टीरक्षकांविषयी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
वर्ल्डकप तोंडावर असतानाच बांगलादेशच्या दिग्गजाचा हादरवून टाकणारा निर्णय, जाहीर केली निवृत्ती
नेहरा आयपीएलदरम्यान कागदावर काय करायचा? गुजरातच्या प्रशिक्षकाने स्वतः दिले उत्तर