भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला अहमदाबाद येथे सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारताला इंग्लंडने पराभूत करत मालिकेत विजयी सुरुवात केली. हा सामना भारतीय संघासाठी विसरण्यासारखा राहिला. या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत आहे. त्यानंतर, भारताच्या पराभवाचे खापर ‘या’ चार खेळाडूंवर फोडण्यात आले.
१) विराट कोहली
पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवासाठी कर्णधार विराट कोहलीला जबाबदार धरण्यात आले. विराट या सामन्यात पाच चेंडू खेळून एकही धाव न काढता तंबूत परतला. त्याचा भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमावर परिणाम झाला. सोबतच, कर्णधार म्हणून त्याचे काही निर्णय अगदी न समजण्या पलीकडचे होते.
२) शिखर धवन
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनला या सामन्यात संधी देण्यात आली होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याच्यावरच अतिरिक्त जबाबदारी होती. परंतु, तो या दबावाचा सामना करू शकला नाही. केएल राहुल व कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतरही मार्क वुडच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका खेळून अवघ्या ५ धावांवर तो त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.
३) रिषभ पंत
कसोटी मालिकेतील दमदार कामगिरीनंतर जवळपास वर्षभराने पंतने टी२० संघात पुनरागमन केले. आघाडीचे फलंदाज परतल्यानंतर त्याने चांगली सुरुवात केली. मात्र, २३ चेंडू खेळून २१ धावा केल्यानंतरही आदिल रशीदच्या चेंडूवर विनाकारण मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने जॉनी बेअरस्टोच्या हाती झेल सोपविला. सामन्यातील स्थिती पाहता, तो आणखी काही वेळ संयम दाखवून खेळू शकला असता.
४) युजवेंद्र चहल
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा प्रमुख फिरकीपटू म्हणून खेळत असलेला युजवेंद्र चहल या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. काल आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या चहलने आपल्या गोलंदाजीने सर्वांना निराश केले. तो आपल्या चार षटकात अत्यंत महागडा ठरला. त्याने जोस बटलरचा बळी मिळविला. मात्र, त्यासाठी त्याने ४४ धावा लुटविल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvENG: खराब कामगिरीमुळे इंग्लिश दिग्गजाने टीम इंडियाची केली थट्टा अन् पडला तोंडघशी
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! वाचा मोहम्मद सिराजच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाची कहाणी
रोहित शर्माला का दिली नाही पहिल्या टी२० सामन्यात संधी? पाहा काय म्हणाला विराट कोहली