भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आणि फिरकीपटू युझवेंद्र चहलबद्दल (Yuzvendra Chahal) मोठे भाष्य केले आहे. त्याने या दोन्ही खेळाडूंचा आयपीएल स्पर्धेतील प्रवास हा परिवर्तनकारी असल्याचे सांगितले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २०१३ साली राहुल आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला होता. त्यानंतर तो आरसीबी संघाकडून २०१६ सालीही खेळला होता. दुसरीकडे चहलच्या प्रवासाबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे आणि आरसीबी संघाचे नाते जरा घनिष्टच म्हणावे लागेल. कारण त्याने ७ वर्षे म्हणजेच २०१४ ते २०२१ दरम्यान संघाचे प्रतिनिधित्व केले. चला तर विराटने या दोन्ही खेळाडूंबद्दल काय भाष्य केले आहे सविस्तर जाणून घेऊया…
आरसीबीच्या पॉडकास्टवर बोलताना विराट म्हणाला की, “माझ्या डोक्यात फक्त दोनच व्यक्तींचे नाव येत आहे, ते म्हणजे केएल राहुल आणि युझवेंद्र चहल होय. राहुल सन २०१३ मध्ये करुण नायर आणि मयंक अगरवालसोबत संघात सामील झाला होता. राहुल कधीच मला टी२० क्रिकेट प्रकारातील स्पेशलिस्ट म्हणून दिसला नाही. तो २०१५ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग झाला होता आणि अविनाश वैद्य आमचे पहिले मॅनेजर होते. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. कारण, ते राहुलच्या संपर्कात होते. तसेच त्याला खेळण्याची जास्त संधी मिळत नव्हती. तरीही मी राहुलला भारतासाठी खेळताना पाहिले होते.”
विराटने आरसीबीसाठी खेळताना आपल्या आणि राहुलच्या सुरुवातीच्या संबंधांवरही चर्चा केली. तो म्हणाला की, “राहुलने जेव्हा आरसीबी संघाची साथ सोडली, त्यानंतर मी त्याला जास्त खेळताना पाहिले नव्हते. मात्र, मी ऐकले होते की, तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. तो जेव्हा आरसीबीमध्ये नव्हता, तेव्हा खूपच तरुण होता आणि मी भारतासाठी खेळत होतो. आम्ही आरसीबीसाठी नियमितरीत्या खेळत होतो. त्यामुळे तेव्हा वास्तवात आमचा एकमेकांशी जास्त संपर्क आला नव्हता. त्यानंतर सन २०१४ मध्ये जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते, तेव्हा त्याने शानदार फलंदाजी केली होती. मी त्यावेळी त्याला पाहून हैराण झालो होतो की, या खेळाडूने स्वत:मध्ये खूपच बदल केले आहेत. मी राहुलचे हावभाव, त्याचा आत्मविश्वास आणि त्याच्या व्यवहारामुळे खूपच प्रभावित झालो होतो.”
शेवटी आरसीबीने २०१६साली साईन केल्याचेही विराटने सांगितले. तो म्हणाला की, “त्यावेळी तो हैदराबादसाठी खेळत होता. मात्र, त्याला जास्त संधी मिळत नव्हती. ज्यावेळी त्याला संधी मिळत होती, तेव्हा मला जाणवले की, तो दबावात खेळत होता. तो स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. मी विचार केला की, जर त्याला संधी मिळाली असती, तर तो खूप चांगली कामगिरी करू शकतो.”
दुसरीकडे चहलबद्दल बोलताना विराट म्हणाला की, “आरसीबीमध्ये येण्यापूर्वी चहलला आयपीएलमध्ये जास्त संधी मिळाली नव्हती. तो असा गोलंदाज आहे, ज्याला नेहमीच चेंडू घ्यायचा असतो आणि चिन्नास्वामीमध्ये त्याने जी कमाल केली, त्याला तोडच नाही. त्याचे नशीब तेव्हाच बदलले. राहुल आणि चहलची कहाणी आहेच अशी की, मी ज्याबद्दल विचार करू शकेल. या दोघांनाही संधी मिळाली आणि त्यांनी कमाल करून दाखवली.”
केएल राहुलच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ९४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८५ डावात ४७.४३ च्या सरासरीने ३२७३ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शकतेही झळकावली आहेत. दुसरीकडे युझवेंद्र चहलबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ११४ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११३ डावात ७.५९ च्या इकॉनॉमी रेटने १३९ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल २०२२ बद्दल बोलायचं झालं, तर २६ मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधाराचा ‘हा’ सल्ला आला कामी, इशानने श्रीलंकेविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीचे श्रेय दिले रोहितला
द्रविड-गांगुलीसोबतली चर्चा उघड करणे वृद्धिमान सहाला पडणार महागात? बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय