चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 296 धावांची खेळी खेळली. सामन्याला आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. या दोन दिवसांत भारत काय कमाल करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ (Australia Team) भारताला (Indian Team) ओव्हलवर मोठी धावसंख्या करण्यापासून सतत आपल्या गोलंदाजीने रोखत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) संघाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 469 धावा दिल्या. तर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारतीय संघ 71/4 पर्यंत गडगडला. केवळ अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांच्या 109 धावांच्या भागीदारीमुळे त्यांनी फॉलोऑन टाळला.
राहुल द्रविडवर दावा केला पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अलीने
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली (Former Pakistani cricketer Basit Ali) यांनी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यादरम्यानच्या काही निर्णयांवर टीका केली. अली म्हणाला की, “भारतीय संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सामना हरला आणि आता ऑस्ट्रेलियन संघाला रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चमत्काराची आशा करणे.”
“भारताने सामना तेव्हाच गमावला जेव्हा त्यांनी पहिल्या दोन तासांत गोलंदाजी करण्याचा निर्यण घेतला. भारतीय संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली ते अगदी आयपीएलसारखी होती. लंचपर्यंत, भारतीय गोलंदाज इतके आनंदी दिसले की जणू त्यांनी सामना जिंकला आहे.” असे माजी पाकिस्तानी फलंदाज त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाले.
पुढे बोलताना अली म्हणाला की, “सर्व भारत आता फक्त आशा बाळगु शकतो आणि चौथ्या डावामध्ये चमत्कार घडण्याची अपेक्षा ठेऊ शकतो. भारतीय संघा जेव्हा मैदानात उतरला त्या 120 षटकांमध्ये मला फक्त 2-3 खेळाडू तंदुरुस्त दिसून आले – रहाणे, कोहली आणि जडेजा. बाकीचे थकलेले दिसत होते.”
“क्रिकेटपटू बनलेल्या प्रशिक्षक राहूल द्रविडला भारताचा दृष्टीकोन समजू शकला नाही” असा दावा करत त्याची क्रूर टीका केली. पुठे तो म्हणा की, “मी राहुल द्रविडचा खूप मोठा चाहता आहे. नेहमीच होतो आणि राहीन. तो एक उत्तम खेळाडू आहे, महान आहे. पण प्रशिक्षक म्हणून तो पूर्णपणे शून्य आहे. भारत जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हा तिथे अशाच विकेट मिळत होत्या का? त्यांच्याकडे उसळत्या खेळपट्ट्या होत्या, बरोबर? देव जाणे तो काय विचार करत होता.” आयसीसी ट्रॉफीसाठी भारताला आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलिया कसोटीत आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा विचार करेल.
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं