आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असते आणि त्यात त्याला संघाच्या कर्णधाराची भूमिका मिळणे हे त्याहूनही गर्वाची गोष्ट. आंतराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपद भूषवणे हे काही सोपे काम नसते. कर्णधारासमोर छोटे-मोठे कठीण प्रसंग येत असतात. त्यांना या प्रसंगांना सामोरे जाऊन दमदार प्रदर्शन करायचे असते. बऱ्याचदा संघाच्या खराब कामगिरीमुळे कर्णधाराला नेतृत्त्वपदावरुन काढले जाते. परंतु असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी कर्णधाराची भूमिका अगदी चोखपणे पार पाडली आणि जगभरात आपले वर्चस्व गाजवले.
कर्णधाराच्या भूमिकेत असताना खूप पारितोषिक जिंकण्याची संधी असते. आईसीसीद्वारे आयोजित केलेल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ट्रॉफी जिंकणे म्हणजे मोठी गोष्ट असते. कारण आईसीसीच्या स्पर्धांमध्ये जगातील अव्वल दर्जाचे संघ असतात आणि त्यात चषक जिंकून तुम्ही तुमची कर्णधारपदाची योग्यता दर्शवता.
क्रिकेटविश्वात असे काही कर्णधार आहेत, ज्यांनी एकाहून अधिक आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत. आजच्या लेखात आपण माहिती करून घेणार आहोत ते ४ कर्णधार, ज्यांनी सर्वाधिक अधिक आईसीसीची ट्रॉफी जिंकल्या आहेत.
४. क्लाइव्ह लॉयड- २
क्लाइव्ह लॉयड हे क्रिकेटविश्वातील दिग्गज कर्णधारांपैकी एक नाव. त्यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडिजला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकावला होता. या दिग्गजाने वेस्ट इंडिजला १९७५ आणि १९७९ विश्वचषक जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. वेस्ट इंडीजने त्यांच्या नेतृत्त्वापदाच्या कार्यकाळात जगभरात आपला दबदबा निर्माण केला होता.
३. डॅरेन सॅमी- २
डॅरेन सॅमी या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजीने जरी कमी प्रदर्शन केले असले तरीही कर्णधारपदी जो कारनामा केला तो भल्याभल्या कर्णधारांना जमला नाही. २०१२ मध्ये खेळविण्यात आलेल्या टी२० विश्वचषकात डॅरेन सॅमीच्या नेतृत्त्वाखाली वेस्ट इंडीजने विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे २०१६ मध्ये भारताने आयोजित केलेल्या टी२० विश्वचषकाचा मानकरीसुद्ध डॅरेन सॅमीचा वेस्ट इंडीज संघ ठरला होता. अशाप्रकारे डॅरेन सॅमीने आपल्या कर्णधाराच्या भूमिकेत २ आईसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत.
२. महेंद्र सिंग धोनी- ३
माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आपल्या कर्णधारपदी असताना भारतीय क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला. धोनीने मोटमोठ्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करून भारतीय संघाला बरीचशा ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनीने पहिल्यांदा २००७ च्या टी२० विश्वचषकात कर्णधारपद भूषवले आणि त्यात त्याने अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला हरवून भारताला पहिला टी२० विश्वचषक मिळवून दिला.
त्याच्यानंतर २०११ च्या विश्वचषकात भारतीय संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करवून घेत २८ वर्षांनंतर भारताला विश्वचषक मिळवून देण्याचा पराक्रम धोनीने केला होता. याखेरीज २०१३ मध्ये त्यांचा कर्णधारपदावर विरोधकांनी आवाज उठवला होता. याचे प्रतिउत्तर त्याने २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत दिले होते. ही त्याची आईसीसी ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ होती.
१. रिकी पाँटिंग- ४
क्रिकेटविश्वात रिकी पाँटिंगला सर्वात यशस्वी कर्णधार मानले जाते. या कर्णधाराने आपल्या कारकिर्दीत असा संघ बनवला, ज्याला त्या काळात हरवणे खूपच कठीण काम होते. पाँटिंगने आपल्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाला ४ आईसीसी ट्रॉफी मिळवून दिल्या होत्या. त्याने २००३ साली भारताला अंतिम सामन्यात हारवून पहिला विश्वचषक आपल्या नावावर केला होता. त्यानंतर २००६ ला चॅम्पियन्स ट्रॉफी, २००७ ला विश्वचषक आणि २००९ ला पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी असे खिताब त्याने आपल्या नावावर केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यावर असणार भारताचं वर्चस्व, ‘ही’ आहेत त्यामागची समर्पक कारणे
पुनरागमन अशक्य! असे ३ क्रिकेटपटू, ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची झाली बंद
टॉप-३ संघ, ज्यांच्यावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ओढावली पराभवाची नामुष्की; भारत ‘या’ स्थानी