भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याची बॅट 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. सूर्यकुमार याने टी20 विश्वचषक 2022 मध्येही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला आहे. विराट कोहलीसह तो या विश्वचषकात भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून समोर येतोय. त्याच्या या खेळावर भारताचा माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर (Gautam Gambhir) भलताच खुश आहे. त्याने थेट सूर्यकुमार हा आताच स्पर्धेचा मानकरी ठरल्याचे म्हटले.
सूर्यकुमारने रविवारी (06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 61 धावांची खेळीही साकारली. हे त्याचे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. त्याने सुपर 12 फेरीत खेळलेल्या 5 सामन्यात 193.96 च्या स्ट्राईक रेटने 225 धावा चोपल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा तिसरा क्रमांक आहे.
सूर्यकुमार या संपूर्ण विश्वचषकात आपल्या आक्रमक अंदाजाने सर्वांना प्रभावित केले आहे. क्रिकेटच्या पारंपारिक फटक्यांना छेद देत त्याने मैदानाच्या चारही कोपऱ्यात धावा वसूल केल्या आहेत. त्याच्या अशा फलंदाजीचे सर्वत्र कौतुक होतेय. भारताचा माजी सलामीवीर व समालोचक गौतम गंभीर याने त्याचे कौतुक केले. तो म्हणाला,
“सूर्या सध्या अविश्वसनीय खेळतोय. माझ्या मते तो आत्ताच या विश्वचषकात स्पर्धेचा मानकरी ठरला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश नाही केला तरी, तोच स्पर्धेचा मानकरी ठरू शकतो.”
सूर्यकुमार यादव याने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून खेळात सातत्य दाखवलेय. सध्या तो टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. झिम्बाब्वेविरूद्ध 61 धावांची खेळी करताना त्याने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला. टी20 क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा फलंदाज आहे. (Gautam Gambhir Said Suryakumar Is Man Of The Tournament For Me)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! रे*प केसचा आरोपी धनुष्का गुणतिलकाची श्रीलंका संघातून हकालपट्टी, जामीनही नाही मिळाला
वाईट काळात केवळ ‘या’ व्यक्तीने वाढवला विराटचा आत्मविश्वास; स्वतः केला खुलासा