भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्या दरम्यान सध्या काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. चालू वर्षाच्या मध्यात होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र, भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्या स्पष्ट नकार दिला असून, आशिया चषक युएई व पाकिस्तान अशा दोन देशांमध्ये खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने घेतला. असे असतानाही पीसीबी संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्यावर अडून बसल्याचे दिसते. आता या संपूर्ण प्रकरणावर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषक 2023 चे यजमानपद सुरुवातीला पाकिस्तानकडेच होते. मात्र, पाकिस्तानातील परिस्थिती पाहता भारतीय संघाने तिथे खेळण्यास नकार दिला पाकिस्तानात सातत्याने आतंकवादी कृत्य घडत असतात. तसेच उभय देशांमध्ये राजकीय तणाव देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
या प्रकरणावर आशियाई क्रिकेट परिषदेने तोडगा काढत आशिया चषकातील भारतीय संघाचे सामने युएईमध्ये खेळण्याचे निश्चित केले. तरीदेखील पीसीबी संपूर्ण स्पर्धेचे यजमानपद आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करतेय. त्यांनी भारतीय संघाला संपूर्ण सुविधा व सुरक्षा पुरवण्याचा शब्द दिला आहे. मात्र, यावर हरभजन सिंगने अगदी कठोर शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली. हरभजन म्हणाला,
“भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा करूच नये. पाकिस्तानात त्यांचे स्वतःच्या देशातील नागरिक सुरक्षित नाहीत. ते एका मोठ्या संघाला कशी काय सुरक्षा देणार? आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला भेटले तरी, भारतीय संघाने तिथे जाण्याची जोखीम पत्करू नये.”
भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानत न आल्यास पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी भारतात येणार नाही, अशी भूमिका पीसीबीने काही काळापूर्वी घेतली होती.
(Harbhajan Singh Slams Pakistan Cricket Board On Point Of Asia Cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एका पराभवाने खचला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर; म्हणाला, ‘आम्ही राहुलसारखी फलंदाजी…’
ब्रेकिंग! विराटच्या RCBची ताकद वाढली, भारताविरुद्ध 140 धावा चोपणारा ‘हा’ खेळाडू ताफ्यात सामील