भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला तो पत्रकारांना सामोरे गेला. यावेळी त्याला कसोटी संघातील पुनरागमनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सर्वांना चकित करत सध्या पुनरागमनाचा इरादा नसल्याचे म्हटले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना मुंबई येथे 17 मार्च रोजी खेळला जाईल. या सामन्याला भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणाने हजर राहणार नाही. त्यामुळे हार्दिक संघाचे नेतृत्व करेल. सामन्याच्या पूर्वसंध्येला तो पत्रकार परिषदेत पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात खेळणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“इमानदारीने सांगायचे झाल्यास मी सध्या कसोटी क्रिकेट खेळण्यास इच्छुक नाही. मला संघात जागा मिळूदेखील शकते. मात्र, कसोटी संघात जागा बनवण्यासाठी मी काहीही केलेले नाही. मी थेट अंतिम सामन्यात खेळल्यास एका खेळाडूवर हा अन्याय होईल. कारण त्या खेळाडूने संघात आपली जागा बनवलेली आहे. मी मेहनत करून संघात पुनरागमन करेल.”
हार्दिक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असला तरी, मागील जवळपास चार वर्षांपासून तो कसोटी संघाचा भाग नाही. 2018 इंग्लंड दौऱ्यावर त्याने आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता. हार्दिकच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केल्यास, 11 कसोटीत त्याने 32 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याबरोबर त्याच्या नावे 17 बळी देखील जमा आहेत.
(Hardik Pandya Said No Plans For Comeback In Test Team For WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन-जडेजा की अक्षर? WTC फायनलमध्ये कोणाला मिळणार जागा? वरिष्ठ खेळाडूने दिले उत्तर
शोएब अख्तरचे ‘हे’ विधान चर्चेत, जाणून घ्या आधार कार्डविषयी काय म्हणाला पाकिस्तानी दिग्गज