भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथील कसोटी सामना नुकताच पार पडला.या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो यष्टिरक्षक रिषभ पंत. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेपासून रिषभ पंत सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत येत आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर रिषभ आता भारतात परतला आहे. भारतात परतल्यानंतर रिषभने ट्विटरवर पोस्ट केली की, तो नवे घर शोधत आहे त्यासाठी पर्याय सांगा. यावर भारताचा माजी क्रिकेट खेळाडू इरफान पठाणने रिषभची फिरकी घेतली आहे.
रिषभने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वर लिहिले,”जेव्हापासून ऑस्ट्रेलियातून आलो आहे तेव्हापासून घरचे मागे लागलेत की नवीन घर घे. गुरगाव योग्य असेल का ? आणखी काही पर्याय असेल तर सांगा.”
Jabse Australia se aaya hoon gharwale peeche pade hain ki naya ghar le lo ab. Gurgaon sahi rahega? Aur koi option hai toh batao.
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 28, 2021
रिषभच्या या ट्विटवर इरफान पठाणने मजेशीर कमेंट करत लिहले, “क्रिकेट ग्राउंड खरेदी करणे, कसे राहिल?” रिषभच्या या पोस्टवर इरफान प्रमाणेच चाहत्यांनी देखील मजेशीर कमेंट्स केलेल्या आहेत.
How about buying a cricket ground ??
— Irfan Pathan (@IrfanPathan) January 28, 2021
दरम्यान रिषभच्या कामगिरीचा विचार केला असता, त्याने ब्रिस्बेन येथे अविश्वसनीय खेळी केली. रिषभने सामन्याच्या पाचव्या दिवशी 138 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह आक्रमक नाबाद 89 धावा केल्या. रिषभच्या या खेळीमुळेच भारतीय संघाला 328 धावांचे डोंगरा एवढे लक्ष पार करण्यात यश मिळाले. आपल्या या आक्रमक खेळी साठी रिषभला सामनावीराचा पुरस्कार देखील घोषित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारी जोमात! भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती