आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) रोजी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. आरसीबीचा आक्रमक फलंदाज एबी डिविलिअर्स यानी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळेच राजस्थानचा पराभव झाला. त्याने 22 चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मी केलेल्या खेळीचा मला गर्व आहे, असे डिविलिअर्स सामन्यानंतर म्हणाला.
एबी डिविलिअर्स म्हणाला की, “गोलंदाजी करताना आम्ही काही नो बॉल फेकले. फिरकीपटू युजवेंद्र चहल सहसा नो बॉल फेकत नाही, आम्ही जर या चुका केल्या नसत्या तर राजस्थानच्या 15 ते 20 धावा कमी झाल्या असत्या. चेंजरुममध्ये जाताना मी कर्णधार विराट कोहलीशी बोललो होतो. मी खूप चिंताग्रस्त होतो आणि मी ते लपवण्याचा प्रयत्न करत होतो. मी तणावत होतो. या सामन्यात केलेल्या कामगिरीचा मला अभिमान आहे.”
“मी संघमालकाला हे दर्शवू इच्छित आहे की मी आयपीएलमध्ये चांगली खेळी खेळण्यासाठीच आलो आहे. माझ्या आयुष्यात कुटुंब, चाहते यांची मोठी भूमिका आहे. मागील सामन्यात मी चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी झालो होतो.”
या सामन्यात राजस्थानने आरसीबीवर दबाव आणला होता. पण एबी डिविलिअर्सवर याचा कोणताच प्रभाव पडला नाही. चेंडू सीमारेषेबाहेर पाठवणे हेच त्याचे लक्ष्य होते. त्याने 22 चेंडूत केलेल्या नाबाद 55 धावांमध्ये 6 षटकारांचा समावेश होता. याशिवाय त्याने एक चौकारही ठोकला. जयदेव उनाडकटला त्याने चांगलेच फैलावर घेतले. डिविलिअर्सने त्याच्या एका षटकात सलग तीन षटकार लगावले.
या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान कायम राखले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मिस्टर ३६०’ ठरला आरसीबीचा संकटमोचक, ७ विकेट्सने राजस्थानला लोळवलं
IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या दिग्गजांकडून ‘अर्जुन’ घेतोय गोलंदाजीचे धडे
“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष