आयपीएल लीगमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मैदानावर नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षीच्या आयपीएल हंगामात हा संघ विजेता होण्यासाठीचा प्रबळ दावेदार मानला जातो, परंतु शेवटच्या मोठ्या सामन्यांमध्ये संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने प्रत्येक वेळी संघ आयपीएल विजेता होण्यास अपयशी ठरतो.
या संघात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांसारख्या जगातील महान क्रिकेटपटूंचा समावेश असूनही या आरसीबी संघाला एकदाही आयपीएल विजेतेपद पटकवता आले नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही विराट कोहलीचा हा संघ पुन्हा एकदा आयपीएल खिताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
तर आज आम्ही तुम्हाला यामध्ये विराट कोहली आता आरसीबी संघ सोडण्याचा विचार करत आहे काय? याबद्दल सांगणार आहोत.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून म्हणजेच 2008 पासून आरसीबी संघाचा भाग राहिला आहे. 2008 साली विराटला आरसीबी संघाने 12 लाख रुपयांत विकत घेतले होते. परंतु, त्यावेळी त्याला आरसीबी संघात एक फलंदाज म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्याची कामगिरी पाहून त्याला 2011 मध्ये त्याला आरसीबी संघाचा उप-कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आणि लगेच दोन वर्षांत 2013 मध्ये त्याला आरसीबी संघाचे नियमित कर्णधारपदही सोपवण्यात आले.
त्यामध्ये गेली 8 वर्षे आयपीएलमध्ये आरसीबी संघाची कमान सांभाळत असून यावेळीही तोच आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आरसीबी या संघाचा यंदाचा पहिला सामना 9 एप्रिल रोजी चेन्नईच्या मैदानावर गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.
तसेच विराटला त्याच्या आयपीएलमधील संघाबद्दल बरेच प्रश्न विचारले जात होते की, तो या हंगामामध्ये आरसीबी संघाला सोडून अन्य कोणत्या संघात सामील होणार आहे काय? यावरती प्रत्युत्तर देताना त्याने सांगितले की “मला वाटत नाही की मी आरसीबी संघाला सोडून आणि आयपीएलमध्ये इतर कोणत्याही संघात खेळेन.”
विराटचा हा निर्णय आरसीबी संघाने आपल्या सोशल मीडिया अकाउंट शेअर करत कोहलीच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे.
"I don't see myself leaving or playing for any other IPL team"
Home is where the heart is! ❤️#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/hCyyZxYQ9M
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 7, 2021
जेव्हा जेव्हा कोहली फलंदाजीसाठी मैदानात येतो तेव्हा गोलंदाजांच्या समोर एक समस्या उभी राहते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे आयपीएलमध्येही त्याने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीमध्ये त्याने 192 आयपीएल सामन्यांमध्ये 38.16 च्या सरासरीने 5878 धावांचा रतीब घातला आहे. त्यामध्ये त्याने आतापर्यंत 5 शतके आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत.
तसेच 5 पैकी 4 शतके त्याने 2016 च्या आयपीएल सत्रात ठोकली होती. या शतकांसह त्याने या मोसमात सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या. तसेच तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात हैं! दिनेश कार्तिकचा दिसला आक्रमक अंदाज, चौकार-षटकारांची केली बरसात, पाहा व्हिडिओ