भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ब्रिस्बेन कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत होते. अशा दबावाच्या परिस्थितीत देखील भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत, 3 गडी राखून सामना जिंकला. भारताच्या या मालिका विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून संघाचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघावर टीकेची झोड उठवली जात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या पराभवाला कर्णधार टीम पेनच्या खराब रणानितीला जबाबदार धरले जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार इयान चॅपल यांनी आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते, जर पेनचा उत्तम पर्याय मिळाला नाही तर स्टीव स्मिथला चेंडू छेडछाड विवादानंतरही कर्णधार केले जावू शकते.
चॅपल यांनी काही कडक शब्दात ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनावर टीका केली आहे. चॅपल म्हणाले ,” चेंडू छेडछाड विवादानंतर स्मिथवर कर्णधार पदासाठी 24 महिन्यांचाच प्रतिबंध लावण्यात आला. तर दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी घालण्यात आली. स्मिथ आणि वॉर्नरसाठी नियम एकसारखेच का नाही.” चॅपल यांच्या मते दोघांचीही चूक एकसारखीच होती व दोघांनाही समान नियम लागू करण्यात यावा.
तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज यष्टिरक्षक इयान हिली यांनी देखील टिम पेनवर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून 119 कसोटी सामन्यात यष्टीरक्षक असलेले हिली म्हणाले ,” वास्तविकता हा कर्णधार, उपकर्णधार व संपूर्ण कोचिंग स्टाफच्या खराब कामगिरीचा परिणाम आहे. संघाचे क्षेत्ररक्षण अतिशय सुमार होते. सर्वप्रथम क्षेत्ररक्षणावर मेहनत घ्यावी. बाकीच्या बाबी आपोआप सुधारतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले विराट आणि अनुष्का; पाहा व्हिडिओ
“बीसीसीआयने विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला कर्णधार करण्याचा विचार करावा”, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे मत