आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने (ICC) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी बेंगलोरमध्ये खेळली गेली. दुसरी कसोटी ३ दिवसात समाप्त झाली. कसोटीच्या पहिल्याच दिवशी १६ विकेट्स गेल्या. पिंक बाॅलने खेळली गेलेली ही दिवस-रात्र कसोटी (Day Night Test) भारतीय संघाने २३८ धावांनी जिंकली. सामन्याचे पंच आणि भारतीय माजी खेळाडू जवागल श्रीनाथने (Javagal Srinath) मैदानाच्या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी मानले आहे, त्यामुळे डिमेरिट पाॅइंट सुद्धा त्याला दिला गेला. ५ वर्षांत कोणत्या खेळपट्टीला डिमेरिट पाॅइंट मिळाले तर त्यावर एका वर्षाचा बॅन लागू शकतो. त्यामुळे या काळात तेथे आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाऊ शकत नाही.
जवागल श्रीनाथने सांगितले की, “खेळपट्टीने पहिल्या दिवशी खूप मोठा टर्न घेतला. प्रत्येक सेशनमध्ये यामध्ये सुधारणा झाली. परंतु माझ्या मते, तेथे चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये योग्य सामना झाला नाही.” आयसीसीकडून सांगितले गेले की, डिमेरिट पाॅइंट ५ वर्षांपर्यंत मानले जातात. अशा स्थितीत ५ गुण झाल्यास आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद हिरावून घेतले जाऊ शकते. मागील काही काळात आयसीसीने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये रावळपिंडीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीला देखील सरासरीच्या कमी मानले होते आणि १ डिमेरिट अंक दिला होता.
भारत आणि श्रीलंका संघांमध्ये टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला, यानंतर दोन सामन्यांच्या कसोटीत सुद्धा भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप देत मालिका २-० ने जिंकली. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंका संघ ४४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २०८ धावांवरच सर्वबाद झाला.
श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शानदार शतक लगावले. भारताने पहिल्या डावात २५२, तर दुसऱ्या डावात ९ विकेट्स घेत ३०३ धावा करत सामना घोषित केला. श्रीलंका संघ पहिल्या डावात फक्त १०९ धावा करू शकला आणि भारताने ही मालिका जिंकली. या विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…तर धोनीने मर्यादीत क्रिकेटमधील जवळपास सर्वच मोठे विक्रम मोडले असते’, गंभीरचा विश्वास
आयपीएल २०२२मध्ये ‘हे’ ५ खेळाडू चालले, तर दिल्ली कॅपिटल्स संघ मिळवू शकतो पहिलेच विजेतेपद
IPL 2022 | फक्त फलंदाजच नाही, आयपीएलमध्ये ‘या’ पंचांनीही केलंय शतक