न्यूझीलंडविरुद्ध सध्या खेळली जात असलेल्या टी२० मालिकेत भारतीय संघात नवीन अणि युवा खेळाडूंनी संधी दिली गेली आहे. मालिकेतली पहिल्या दोन सामन्यात वेंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांनी त्यांचे आतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता पुढच्या सामन्यात देखील काही नवीन चहरे संघात दिसतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. टी२० संघाचा नवीन नियमित कर्णधार रोहित शर्माने याबाबत संकेत दिले आहे.
शुक्रवारी (१९ सप्टेंबर) पार पडलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला, या सामन्यानंतर रोहित शर्माने युवा खेळाडूंनी संधी देण्याबाबत महत्वाची माहिती दिली.
न्यूझीलंडचा सलग दुसऱ्यांदा पराभव केल्यानंतर कर्णधार रोहितने त्याची महत्वाची प्रतिक्रिया दिली. त्यावेळी रोहित म्हणाला की,”हे गरजेचे आहे की, खेळाडूंना मैदानावर वेळ मिळावा. आम्ही त्या खेळाडूंवर नजर ठेवली आहे, जे खेळत आहेत. कारण त्यांनाही अजून जास्त सामने खेळायला मिळाले नाहीत. पाहावे लागेल की भारतीय संघासाठी काय योग्य आहे, आम्ही तेच करू. त्या खेळाडूंसाठी, जे आतापर्यंत खेळले नाहीत, त्यांचीही वेळ येईल, खूप सारे आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळायचे आहेत.”
भारताचा युवा खेळाडू इशान किशनने यापूर्वी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले आहे, पण त्याला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत अद्याप खेळण्याची संधी मिलालेली नाही. तर दुसरीकडे यावर्षी आयपीएलमध्ये अप्रतिम प्रदर्शन केलेला आवेश खान आणि ऋतुराज गायकवाड यांना अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारताने न्यूझीलंडवर २-० अशी आघाडी घेतली असून मालिका जिंकली आहे. अशात या युवा खेळाडूंना पुढच्या सामन्यात खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
न्यूझीलंडविरुद्ध जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाच विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. आता मालिकेतील तिसरा टी-२० सामना कोलकातामध्ये २१ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकला तरी, त्यांना मालिकेत विजय मिळवता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर भारताच्या युवा खेळाडूंना या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅटही तुटली अन् पुढच्या चेंडूवर विकेटही गेली! भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर ‘असा’ झाला निशम आऊट
रांची टी२० सामन्यांतून मोहम्मद सिराजला का केले प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर? बीसीसीआयने सांगितले कारण
भारताकडून दुसऱ्या टी२०त न्यूझीलंड चारीमुंड्या चीत, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार