भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत 2-1ने आघाडीवर आहे. मात्र, भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने मोठा धक्का बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केले. अशात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) सुरुवात होत आहे. अहमबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, भारतीय संंघ मालिकेतील तिसरा सामना जिंकताच, खास विक्रमही रचू शकतो. काय आहे तो विक्रम चला जाणून घेऊया…
भारतीय संघ बनवू शकतो ‘हा’ विक्रम
सन 2013पासून भारतीय संघाने मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अहमदाबाद कसोटी (Ahmedabad Test) सामन्यात विजय मिळवला, तर ही कसोटी मालिकेत विजय मिळवण्याची 16वी वेळ ठरेल. जगभरात इतर कोणताही संघ मायदेशात सलग 10 पेक्षा जास्त मालिका जिंकला नाहीये. दुसरीकडे, वेस्ट इंडिज संघाने मायदेशात 8 मालिका जिंकल्या आहेत.
भारताने मायदेशात जिंकलेल्या कसोटी मालिका
1. ऑस्ट्रेलिया- भारताने 4-0 (4)ने मालिका जिंकली, फेब्रुवारी 2013
2. वेस्ट इंडिज- भारताने 2-0 (2)ने मालिका जिंकली, नोव्हेंबर 2013
3. दक्षिण आफ्रिका- भारताने 3-0 (4)ने मालिका जिंकली, नोव्हेंबर 2015
4. न्यूजीलंड- भारताने 3-0 (3)ने मालिका जिंकली, सप्टेंबर 2016
5. इंग्लंड: भारताने 4-0 (5)ने मालिका जिंकली, नोव्हेंबर 2016
6. बांगलादेश- भारताने 1-0 (1)ने मालिका जिंकली, फेब्रुवारी 2017
7. ऑस्ट्रेलिया- भारताने 2-1 (4)ने मालिका जिंकली, फेब्रुवारी 2017
8. श्रीलंका- भारत ने 1-0 (3)ने मालिका जिंकली, नोव्हेंबर 2017
9. अफगाणिस्तान- भारत ने 1-0 (1)ने मालिका जिंकली, जून 2018
10. वेस्ट इंडिज- भारत ने 2-0 (2)ने मालिका जिंकली, ऑक्टोबर 2018
11. दक्षिण आफ्रिका- भारत ने 3-0 (3)ने मालिका जिंकली, ऑक्टोबर 2019
12. बांग्लादेश- भारत ने 2-0 (2)ने मालिका जिंकली, नोव्हेंबर 2019
13. इंग्लंड- भारत ने 3-1 (4)ने मालिका जिंकली, 2020-2021
14. न्यूजीलंड- भारत ने 1-0 (2)ने मालिका जिंकली, 2021
15. श्रीलंका- भारताने 2-0 (2)ने मालिका जिंकली, 2022
भारताला भारतात हरवणे खूपच कठीण
भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणे खूपच कठीण समजले जाते. भारतीय फिरकीपटूंपुढे जगभरातील भलेभले फलंदाजही नांग्या टाकतात. सन 2013पासून भारताने मायदेशात ज्या 15 कसोटी मालिका जिंकल्या आहेत, त्या 15पैकी 9 मालिकांमध्ये या विरोधी संघाला क्लीन स्वीप केले आहे. मागील 10 वर्षांमध्ये भारताने मायदेशात 45 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 36 सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, 3 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. (ind vs aus in ahmedabad narendra modi stadium if india win 4th test consecutive 16th test series win at home)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोमांचक सामन्यात गुजरातचा पहिला विजय! आरसीबीच्या पदरी सलग तिसरी हार
आता एकच ध्येय! इंग्लंडला पछाडण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार अश्विन