भारताने दक्षिण आफ्रिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत केले. या विजयाने भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना ग्रीनफिल्ड स्टेडियम तिरूअनंतरपुरम, केरळ येथे खेळला गेला. सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा थेट प्रेक्षकांमध्ये गेला. त्याने अनेक चाहत्यांना ऑटोग्राफही दिला आहे. याआधी ग्राऊंडवर एका चाहत्याने त्याचे पाय पडले, याचा फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सामना जिंकण्यासाठी भारताला 107 धावांचे छोटे लक्ष्य मिळाले होते, मात्र खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक नव्हती. या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या केएल राहुल (KL Rahul) याने फलंदाजीसाठी खेळपट्टी आव्हानात्मक ठरली असे सांगितले. मी अशा खेळपट्टीवर कधीच फलंदाजी केली नाही, असेही त्याने पुढे म्हटले आहे.
सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) सीमारेषेवर गेला. तेथे त्याने लहान चाहत्यांना ऑटोग्राफ दिला, काहींसोबत सेल्फीही घेतल्या. ही लहान मुले त्या स्टेडियमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येतात, असे वाटते. कारण त्यांच्याकडे क्रिकेटचे कीटही (साहित्य) दिसत होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रोहितचा त्या बालचाहत्यांना ऑटोग्राफ देतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Just a little something for the fans here in Thiruvananthapuram, courtesy Captain @ImRo45! 😊😊#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/K1dAWzqdA9
— BCCI (@BCCI) September 28, 2022
तसेच सामन्यादरम्यान एका चाहत्याने स्टेडियमच्या सुरक्षारक्षकांना चकवून मैदानात प्रवेश केला. त्या चाहत्याने रोहितच्या पाया देखील पडल्या. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या सामन्याआधीच स्टेडियमच्या बाहेर एमएस धोनी, विराट कोहली, रोहित आणि संजू सॅमसन यांचे मोठमोठे बॅनरदेखील लागले होते.
Fan Moment : मैच में Rohit Sharma के पास पहुंचा फैन, पैर छूए. मैच के बाद रोहित भी फैंस के बीच पहुंचे.#RohitSharma #INDvsSA #INDvsSAT20 #Cricket #CricketTwitter #Kerala #IndiavsSouthAfrica #arshdeepsingh pic.twitter.com/xL2647UsGs
— Shivam शिवम (@shivamsport) September 28, 2022
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सामनावीर ठरला. त्याने 4 षटकात 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या तीन महत्वाच्या विकेट्स डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक आणि रिले रॉसॉ या होत्या. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 8 विकेट्स गमावत 106च धावासंख्या उभारू शकला.
What a beautiful Moments..! 😍🤗❤️#RohitSharma | @ImRo45 pic.twitter.com/GwlrwruYnJ
— Tanay Vasu (@tanayvasu) September 28, 2022
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 107 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झालेली. रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही अनुभवी फलंदाज झटपट तंबूत परतले. मात्र, त्यानंतर केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी नाबाद मॅचविनिंग भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसरा टी20 सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काही गोष्टी कधीच बदलत नाहीत!’, रैनाच्या वर्ल्ड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमधील कॅचची होत आहे चर्चा
INDvSA: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहितच! धोनीला टाकले मागे, वाचा सविस्तर
सिंग इज किंग! 25 दिवसांपूर्वी टीकेचा धनी ठरलेला अर्शदीप आज ठरला हिरो