भारत विरुद्ध श्रीलंंका (INDvSL) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना गुरुवारी (12 जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला 215 धावांवर गुंडाळले. या धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाचे पहिले चार फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर केएल राहुल व हार्दिक पंड्या यांनी चिवट फलंदाजी करत भारतीय संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला. यासह भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली.
2ND ODI. 43.2: Lahiru Kumara to Kuldeep Yadav 4 runs, India 219/6 https://t.co/MY3Wc5253b #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 12, 2023
गुवाहाटी येथील पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ ईडन गार्डन येथे मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला. भारताने या सामन्यासाठी युजवेंद्र चहल याच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली. श्रीलंकेला पुन्हा एकदा या सामन्यात सुरुवात देण्याचा प्रयत्न अविष्का फर्नांडो व पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडो यांनी केला. अविष्का वेगवान 20 धावा काढून बाद झाला. त्यानंतर नुवानिदू व कुसल मेंडीस यांनी 73 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र भारतीय फिरकीपटूंनी सामन्यावर वर्चस्व गाजवले. श्रीलंकेने पुढील पाच बळी केवळ 24 धावांमध्ये गमावले. कुलदीपने तीन तर उमरान मलिकने दोन बळी आपल्या नावे केले. श्रीलंकेच्या तळ्यातील फलंदाजांनी चांगला संघर्ष करत संघाला 200 पार मजल मारून दिली. वेललागेने 32 धावांची खेळी करत श्रीलंकेला 215 पर्यंत नेले. भारतासाठी कुलदीप यादव व मोहम्मद सिराज यांनी सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले.
श्रीलंकेने दिलेल्या काहीशा कमी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी 33 धावांची भागीदारी केली. हे दोघेही अनुक्रमे 17 व 21 धावा करून माघारी परतले. मागील सामन्याचा सामनावीर विराट कोहली हा केवळ चार धावा करू शकला. तर श्रेयस अय्यरने महत्त्वपूर्ण 28 धावांचे योगदान दिले. भारताने 86 धावांवर 4 प्रमुख फलंदाज गमावले असताना श्रीलंकेने सामन्यात पुनरागमन केले. मात्र, हार्दिक पंड्या व केएल राहुल यांनी अतिशय चिवट फलंदाजी करत भारतीय संघाला सामन्यात ठेवले. दोघांनी पाचव्या गड्यांसाठी 75 धावांची भागीदारी केली. हार्दिक 36 धावांची खेळी करून बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने आक्रमक 21 धावा करत भारताला विजयाच्या नजीक आणले. केएल राहुलने अखेरपर्यंत नाबाद राहत 64 धावांची खेळी करत संघाला चार गड्यांनी विजय मिळवून दिला. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (15 जानेवारी) खेळला जाईल.
(India beat Srilanka by 4 Wicket in Kolkata ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोंड आवर हार्दिक! चालू सामन्यात केली आपल्याच खेळाडूला शिवीगाळ; पाहा व्हिडिओ
मागील दोन वर्षांत सिराजच ठरलाय टीम इंडियाच्या गोलंदाजीचा ‘सरताज’! आकडे हेच सांगतात