भारतीय संघाने महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली 2011मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र, त्यानंतर 2023 वर्ष आलं, पण अद्याप भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये. अशात भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणालाय की, सध्याच्या संघाने ती निर्भीडता दाखवली नाहीये, जी आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी हवी असते. तसेच, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातही चार वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय योग्य नसल्याचे त्याने म्हटले. मागील दहा वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी न जिंकणाऱ्या भारतीय संघाची स्थिती ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब आहे. अशात समालोचकाची भूमिका साकारणाऱ्या हरभजनने भारतीय खेळाडूंना सल्ला दिला आहे.
काय म्हणाला हरभजन सिंग?
हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, “कौशल्याची कमतरता नाहीये. जितके मोठे सामने खेळतील, तितके चांगले राहील. मला वाटते की, अशा सामन्यात मोकळेपणाने खेळण्याची गरज आहे. आपण खूपच बचावात्मक खेळत आहोत. आपल्याला निकालाची चिंता न करता खेळावे लागेल.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “खेळाडूंवर जबाबदारी टाका आणि ते नक्कीच आपले काम पूर्ण करतील. त्यांच्यावर दबाव टाकला जावा की, चांगले खेळले नाहीत, तर काहीजण बाहेर होतील आणि काही नाही (त्यांचा आत्मविश्वास कमी होईल).”
“त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे की, जरी चांगले खेळला नाहीत, पण तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करा. अशाप्रकारेच तुम्ही चषक जिंकता. निर्भीडतेने खेळा,” असेही तो म्हणाला. जगातील अव्वल क्रमांकाचा फिरकीपटू आर अश्विन याला बाहेर राहावे लागले. कारण, भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत उतरला आहे.
“सामना पाच दिवसाचा आहे, तर पाच दिवसांची स्थिती पाहून गोलंदाजांना निवडायचे असते. अश्विन शानदार गोलंदाज आहे आणि चार वेगवान गोलंदाजांची गरज नव्हती. चौथा आणि पाचवा दिवसही पहिल्या दिवसाप्रमाणेच महत्त्वाचा असतो. हे महत्त्वाचे आहे की, त्या दिवसात तुम्ही कशाप्रकारे खेळता,” असेही हरभजन म्हणाला.
“कदाचित संघ व्यवस्थापनाने याबाबत जास्त विचार केला नाही आणि चार वेगवान गोलंदाजांना खेळवले. जर मोहम्मद सिराज किंवा मोहम्मद शमी यांच्यासारखा कोणता गोलंदाज बाहेर बसला, तेव्हाच चार वेगवान गोलंदाजांना उतरवणे समजून घेतले जाते. अश्विनला खेळवणे आणि चार वेगवान गोलंदाजांऐवजी दोन फिरकीपटूंना खेळवणे योग्य ठरले असते.”
भारतीय संघाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. यानंतर भारताला पहिल्या डावात धावा करताना संघर्ष करावा लागला. भारताने अजिंक्य रहाणे (89) आणि शार्दुल ठाकूर (51) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्व विकेट्स गमावत 296 धावाच केल्या होत्या. अशाप्रकारे भारत 173 धावांनी पिछाडीवर पडला होता. (india become too tight in big games need to play fearlessly to win titles harbhajan singh)
महत्वाच्या बातम्या-
चुकीला माफी नाही!! कर्णधार कमिन्सच्या ‘त्या’ दोन चुका भारताच्या पथ्यावर, कांगारुंच्या धावांचा डोंगर पोखरला
उठ लाबूशेन जागा हो..! विकेट गेली वॉर्नरची पण झोप उडाली लाबूशेनची, मजेशीर व्हिडिओ तूफान व्हायरल